Thursday, June 24, 2010

आदर्शवत उपक्रम...पण कायम स्वरूपी हवा


गोदावरीच्या स्वच्छतेतून सामाजिक-अध्यात्मिक क्रांती करण्याचा संकल्प श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांनी सोडलायं. "सकाळ माध्यम समूहा' च्या "गोदावरी वाचवा-प्रदूषण थांबवा' या अभियानात केंद्राने सहभाग घेतला.
तीन दिवस राबवलेल्या स्वच्छता मोहीमेची सांगता `गंगादशहरा` उत्सवानं झाली. गोदावरीपूजनासाठी गोदाकाठी श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी एकत्र आले होते. केंद्र प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी विधीवत गंगापूजन केलयं. पर्जन्य सुक्ताचं पठण सेवेकऱ्यांनी केल्यानंतर महाआरती झाली.
आरतीनंतर गोदामाईला आर्घ्य देण्यात आलं. यावेळी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी गोदावरी स्वच्छतेत योगदान देण्याचा शब्द दिला. गुरुमाऊलींनी स्वच्छतेचा उपक्रम दरमहा राबविण्याची सूचना सेवेकऱ्यांना केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍लांनी पौरोहित्य केलयं. सामुदायिक सहभागातून गोदावरीची स्वच्छता हेच गोदापूजन होयं, असा संदेश देत गंगादशहरा उत्सवानं दिलायं. गंगापूजनावेळी स्वच्छतेच्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याची आग्रही भूमिका सेवेकऱ्यांनी मांडलीयं. स्थैर्य, शांतता, समाधानाच्या जोडीलाच नैसर्गिक आपत्तीपासून मुक्त राहाण्याची शक्ती गोदामाईनं द्यावी, अशी प्रार्थना करत या अनोख्या उत्सवाची सांगता झालीयं.

एकच झेंडा घ्या हाती...

शिवसेना कार्यप्रमुख उद्वव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी काही ज्येष्ठ शिवसैनिक तसंच मनसैनिकांनी चळवळ सुरु केलीय. माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमखाली ही चळवळ सध्या सुरुय. याच चळवळींतर्गत मुंबईत शिवसैनिक आणि मनसैनिकांचा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यात उद्वव आणि राज यांना एकत्र आणण्याचा पुन्हा निर्धार करण्यात आला
राज आणि उद्वव ठाकरे हे दोन्ही भाऊ काही कारणांमुळं एकमेकांपास्न दूरावलं गेले. या भावाच्या विभक्तपणाचा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसतोय. त्याचप्रमाणं हिंदुमतांचीही विभागणी होऊ लागलीय. हेच लक्षात घेऊन या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी 16मे रोजी ज्येष्ठ शिवसैनिक सतिश वळूंज आणि त्याच्या सहा मित्रांनी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमद्वारे या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
याच चळवळीअतंर्गत वाळूंज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच राज आणि उद्वव यांना एक आवाहनात्मक पत्र पाठवलंय. शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्यासोबत राज आणि उद्वव असलेलं हे छायाचित्र आम्हाला हवंय. ते साकार व्हायला हवं असं वाळूंज यांची संकल्पना आहे.
यानिमित्तानं मेळाव्यास्थळी उभारण्यात आलेल्या पोष्टरवरही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत राज आणि उद्वव यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय.या मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याचअंतर्गत आगामी काळात एसएमसद्वारे तसंच नव्यान वेबसाईट सुरु करून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि गावपातळीपर्यत पोहचण्याचं ध्येय निश्चीत करण्यात आलंय.