Saturday, October 7, 2023

बारा गावांना सौर उर्जेच्या पुरवठ्याचा ध्यास घेतलेला अवलिया!


भारनियमाने त्रस्त शेतकऱ्यांना फायदा :विहामांडवा गावातील अनोखा प्रयोग




#REinIndia,@eathjournalism  औरंगाबादः दैनंदिन वीज भारनियमाने त्रस्त असलेल्या पैठण तालुक्यातील बारागावातील शेतकऱ्यांना विहामांडवा येथील सौरउर्जा प्रकल्पाने मदतीचा हातच जणू दिला आहे. चार एकरवर उभारलेल्या या सौरउर्जाप्रकल्पामुळे दिवसाही सहज,स्वस्त आणि किफायतशीर वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येत आहे. या अवलियाने या अनोखा प्रयोग केला असून औरंगाबाद परिसरात हा प्रयोग इतरांसाठी दिशादर्शक म्हणता येईल.

अर्थ जर्नालिझम नेटवर्क(ईजीएन)तर्फे नुतनीकरण उर्जा अर्थात रिन्युएबल एनर्जीविषयी महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा औरंगाबाद येथे घेण्यात आली. याच अंतर्गत सहभागी पत्रकारांना संयोजकांनी या अनोख्या प्रयोगाच्या ठिकाणी भेटीस नेले. राज्यातील वीज भारनियमन हा काही नवीन विषय नाही, ग्रामीण भागातील गावकरी, शेतकऱ्यांना तर नेहमीच या समस्येला तोंड द्यावे लागते. दिवसा वीज राहणे हे त्यांच्यासाठी क्वचितच घडते भारनियमन हे तर त्यांच्या पाचवीच पूजलेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण हिच समस्या पैठण तालुक्यातील उद्योजक अजय सिसोदिया,सुनिल सिसोदिया या बंधूच्या लक्षात आली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी वेगळे काही करण्याच्या उद्देशाने कालीका जिनिंग अँन्ड प्रेसिंग प्रा.लिमिटेड या कंपनीने मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून चार एकरवर सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले.या उभारणीसाठी आदित्य ग्रीन एनर्जी प्रा.लिमिटेडचे संचालक आणि निवृत्त अधिकारी अदिनाथ सांगवे यांची महत्वपूर्ण मदत,मार्गदर्शन लाभले.

अन् उभा राहिला दिमाखदार प्रकल्प

सिसोदिया बंधूनी आपल्या शेतात प्रकल्प उभारण्याचे निश्चित केल्यानंतर पर्यावरणपुरक सर्व नियमांना अधिन राहून नियोजन केले. २०११ ला चार एकरवर दोन मेगावँटच्या या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. दोनशे किलोचे दहा इनर्व्ह्रटर असून त्याद्वारे साठवणूक व अन्य प्रक्रीया होते. सुरवातीला कमी असणाऱ्या या पॅलनची संख्या नंतरच्या काळात वाढविण्यात आली आहे. आज जवळपास सातहजार(३३५ वॅटचै) पॅनल बसवले आहे.  वर्षाला सोळा लाख युनिट मेगावँटची निर्मिती होते, या निर्मितीच्या साठवणूकीतून विहामांडवा परिसरातील बारा गांवा दिवसा(साडेनऊ ते साडेपाच) सौर उर्जा पुरवठा केला जातो. त्यामुळे दिवसाच्या भारनियमनातून शेतकऱ्यांची एकप्रकारे मुक्तताच झालेली आहे.  .

एकदाच गुंतवणूक,रोबोटद्वारे सफाई

सुरवातीच्या काळात काही चीनमधील यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आली आज मात्र सर्व साहित्य हे भारतीय बनावटीचेच वापरले जाते. जवळपास सात कोटीची प्रकल्पाची गुंतवणूक आहे. सौरउर्जा प्रकल्पाच्या पॅनलची सफाई हा देखील एक किचकट भाग असतो. पण सिसोदिया बंधूनी यातही अत्याधुनिक रोबोट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे एकदा सेटिंग करून दिली कि रोबोटद्वारे पॅनलची पूर्ण सफाई रोबोकडून करण्यात येते, सफाईचे हे अनोखे तंत्रही आश्चर्यकारक म्हणता येईल.विशेष म्हणजे या प्रकल्पाची २५ वर्षाची किमान गॅरंटी असून त्यानंतरही प्रकल्पांतील साहित्याच्या प्रत्येक पार्टचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो असे अदिनाथ संगवे यांनी सांगितले.. मोबाईलच्या माध्यमातून पॅनलमध्ये काही नादूरूस्ती झाली किंवा किती युनिट निर्मिती झाली, याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध होत असते,देखभाल,दूरूस्तीचा खर्च तसा येतच नसल्याचे अजय सिसोदीया यांनी सांगितले. यावेळी ईजीएनचे व्यवस्थापन जॉयदिप गुप्ता,समन्वयक अतुल देऊगांवकर यांचा संयोजकातंर्फे सत्कार करण्यात आला.

चौकट

सौरउर्जेच्या प्रोत्साहनासाठी पुढाकार

भारनियमाच्या मुक्ततेसाठी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री सौरउर्जा संरक्षित योजनेचा दुसरा टप्पाही सुरु झाला आहे. तसेच केंद्र शासनाने सुध्दा याच धर्तीवर कुसुम योजना कार्यन्वित केली आहे. सौरउर्जा प्रकल्प उभारण्यास कुणी इच्छुक असल्यास त्याची जागा असल्यास भरीव असे अनुदान दिले जाते तसेच सर्व साहित्याची खरेदी, विमा यासाठी अनुदान दिले जात आहे. किमान आठ तास विज उपलब्ध व्हावे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

---------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, May 5, 2021

निशब्द करून गेले दोन ध्येयवेडे मित्र...

  

     मला आठवतं, बरोबर दोन-अडीच वर्षापूर्वी सिन्नरमध्ये युवानेते उदय सांगळे,शितल सांगळे,माजी आमदार जयंत जाधव यांच्या पुढाकारातून अ.भा.कबड्डी स्पर्धा झाली. या स्पर्धेचे वार्ताकनं मी करावं अशी मराठमोळ्या कबड्डीला वाहुन घेतलेल्या संघटक,प्रशिक्षक कै.प्रशांत भाबड आणि विलास पाटील या दोन्हीही माझ्या प्रिय मित्रांची इच्छा होती, माझी भेट घेत त्यांनी स्पर्धा सिन्नरला येऊन कवर करण्याची गळही घातली आणि मैत्रीमुळे मलाही त्याचा शब्द टाळता आला नाही आणि मग कार्यालयीन परवानगी घेऊन मीही दिवसभर काम करून सायंकाळी पाचनंतर आठवडाभर सिन्नरला या दोन्ही मित्रांबरोबर गेलो,सोबत कैलास ठाकरे आणि आणखी एक दोन हौशी कबड्डी शिक्षक असायचे,हे सारे जण आपला दिवसभराचा व्याप,कामे सांभाळून सीबीएसला एकत्रित येत आणि मग आम्ही सारे तिकडे जात होते. अर्थात तिकडे गेल्यापासून रात्री अकराला वेळापत्रकाप्रमाणे सामने पूर्ण होईपर्यत सांगळे यांनी ध्येयवेड्या प्रशांत,विलास सर ग्राऊंडवर जातीने हजर राहून कामात व्यस्त होतं, अगदी मैदानाची आखणी, पंचाची नेमणूक,इलेक्ट्रीक टायमर सेट करण्यापासून मैदानावरील वादांचे प्रसंग मिटविण्यापर्यतची मध्यस्थी त्यांना करावी लागत असे. जयंत जाधव,सांगळे यांचा या प्रशांत,विलास या द्वयींवर विश्वास असल्याने दैनंदिन सामन्यांच्या नियोजनांची आणि कार्यक्रमांच्या तयारीची मोठी जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर देण्यात आलेली होती. त्यामुळे रात्री नाशिकला बारा-साडेबाराला आल्यानंतरही तितक्याच उत्साहाने  दुसऱ्या दिवशीही सिन्नरला जाण्यासाठीचा त्याचा उत्साह अवर्णनीयच...     

     


कबड्डीसाठी काहीही करण्यास तयार असलेल्या या दोघांची तळमळ ही कामे करतांना पार पाडतांना क्षणोक्षणी जाणवत होती. नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात कुठेही कबड्डीचे सामने असो हे दोघेही जातीने हजर राहून जिल्हा,राज्य संघटनेने दिलेली जबाबदारी पार पाडत आपला खारीचा वाटा उचलत,योगदान देत असतं. शाळेतील खेळाडूंसाठी असो की मैदानावरील कबड्डीच्या संघासाठी असो ते घडविण्यासाठी त्यांची कष्ट करण्याची कायमच तयारी होती. स्वतः खेळाडू म्हणून पुढे आल्याने त्यांना खेळाडू,प्रशिक्षक,संघटकांना येणाऱ्या अडचणींची जाणीव होती, अगदी त्यांच्याशी संवाद साधतांना त्याची ही भावना कायमच जाणवत असे, खेळाडू मोठे झाले पाहिजे, त्यांना नोकरी लागली पाहिजे, यासारख्या मुद्यांवर काहीही करण्यास ते नेहमी तत्पर असतं,महापौर कबड्डी स्पर्धा,एनकेपीएल असो कि हौशी निमंत्रितांची स्पर्धा सर्वच नियोजनात जिल्हा कबड्डी संघटनेच्या नियोजनात त्यांचा सक्रीय सहभाग जाणवत होता.या दोन मित्रांशी प्रत्येकानेच मैत्री करावी असेच त्याचे वागणे,बोलणे, चालणे होते. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात आलेले प्रत्येकजणच त्यांचे मित्र झाले आणि हे मैत्रीपण त्यांनीपण जपले, आयुष्यात सतत कबड्डीतील संघविजयाचाच विचार करणाऱ्या हे दोन मित्र कोरोनाच्या लढाईत मात्र हरले आणि  अवघ्या दहा दिवसांच्या फरकाने त्यांना मृत्युने कवटाळले. अशा या मैत्रीच्या दुनियेतील दोन राजांना भावपूर्ण श्रध्दांजली....  

Thursday, May 10, 2018

दाजीबा वीर...नाशिकमधील लक्षवेधक परंपरा

नाशिकः नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा,परंपरा जपल्या जातात. होळीनंतर वीर नाचविण्याची परंपराही अशीच काहीशी वेगळीच आहे. त्यातही दाजीबा वीर हा मानाचा असतो. त्यांचे दर्शन घेणाऱ्या व्यक्तीला खूप पुण्य मिळते,असे मानले जाते, विशेषतः लहान मुलांना त्यांच्या हातात दिल्यानंतर सर्व इडापिडा टळून आजारांपासून मुक्तता मिळते असे  बोलले जाते....

अंतिम प्रवासही सजवलेल्या अवस्थेतच..

अंतिम प्रवासही सजवलेल्या अवस्थेतच..... 
आयुष्यभर रंगभूमीवर काम केल्यानंतर आपला शेवटचा प्रवास हा रंगभूमीवरच जात आहे. अशाच थाटात असावा, अशी त्यांची जेष्ठ रंगकर्मी,नाटककार नेताजी भोईर यांची इच्छा होती. इच्छेनुसार तिरडीवर त्यांच्या चेहऱ्याला मेकअप करण्यात आला. निस्तब्ध करणारे हे दृश्य