Thursday, June 24, 2010

आदर्शवत उपक्रम...पण कायम स्वरूपी हवा


गोदावरीच्या स्वच्छतेतून सामाजिक-अध्यात्मिक क्रांती करण्याचा संकल्प श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांनी सोडलायं. "सकाळ माध्यम समूहा' च्या "गोदावरी वाचवा-प्रदूषण थांबवा' या अभियानात केंद्राने सहभाग घेतला.
तीन दिवस राबवलेल्या स्वच्छता मोहीमेची सांगता `गंगादशहरा` उत्सवानं झाली. गोदावरीपूजनासाठी गोदाकाठी श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी एकत्र आले होते. केंद्र प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी विधीवत गंगापूजन केलयं. पर्जन्य सुक्ताचं पठण सेवेकऱ्यांनी केल्यानंतर महाआरती झाली.
आरतीनंतर गोदामाईला आर्घ्य देण्यात आलं. यावेळी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी गोदावरी स्वच्छतेत योगदान देण्याचा शब्द दिला. गुरुमाऊलींनी स्वच्छतेचा उपक्रम दरमहा राबविण्याची सूचना सेवेकऱ्यांना केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍लांनी पौरोहित्य केलयं. सामुदायिक सहभागातून गोदावरीची स्वच्छता हेच गोदापूजन होयं, असा संदेश देत गंगादशहरा उत्सवानं दिलायं. गंगापूजनावेळी स्वच्छतेच्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याची आग्रही भूमिका सेवेकऱ्यांनी मांडलीयं. स्थैर्य, शांतता, समाधानाच्या जोडीलाच नैसर्गिक आपत्तीपासून मुक्त राहाण्याची शक्ती गोदामाईनं द्यावी, अशी प्रार्थना करत या अनोख्या उत्सवाची सांगता झालीयं.

No comments:

Post a Comment