Tuesday, November 17, 2009

विक्रमांचा बादशहा

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटप्रेमींचा देव... क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटानं विश्वविक्रमांचे डोंगर रचलेत. त्यानं तमाम क्रिकेटरसिकांना नेहमीच आपल्या सहजसुंदर फलंदाजीनं मंत्रमुग्ध केलंय. त्यामुळेच लाडका सचिन क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातल्या ताईत बनलाय.
सचिन रमेश तेंडुलकर....मूळचा मुंबईकर...जन्म २४ एप्रिल १९७३...वय३६वर्षे...उंची ५फूट ५ इंच...काहीसं एवढंच वर्णन ऐकलं की,समोर मुर्ती उभी राहते सचिन तेंडुलकरची. मुर्ती लहान पण किर्ती महान...हे शब्द तेंडुलकरच्या बाबतीत खरोखरच तंतोतंत खरे ठरतात किंबहुना त्यानेच ते खरे करून दाखवलेत. सचिननं वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याला १५नोव्हेंबर १९८९ला कराचीत भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात संधी मिळाली. या सामन्यातला सहभाग त्याला परमोच्च आनंद देणारा ठरला. सामन्यात त्याला टेस्ट कॅप मिळाली आणि सचिन भारतीय संघाचा अधिकृत फलंदाज झाला. पण या सामन्यात त्याला फलंदाजीस वाव मिळाला नाही.

६ मार्च १९९०ला वेलिंग्टन इथल्या न्युझीलंडविरूध्दच्या सामन्यात एक धाव नोंदवत त्यानं आपल्या धावांची सुरवात केली. खेळण्यास सुरवात केल्यानंतर बरोबर २वर्षानंतर१९९२ला त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर त्यानं पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या धावांच्या सरासरीकडे लक्ष दिल्यास प्रत्येक वर्षी साधारणतः एक हजार धावा जमा करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवलेले दिसते.एवढेच नव्हे तर हे उद्दीष्ट साध्य करायचंच या ध्येयानं तो आपली खेळी करतांना दिसतो.

कसोटी कि एकदिवसीय सामना अर्धशतक,शतक झळकवत त्यानं आपली घौडदौड सुरुच ठेवली. पाकिस्तान,न्युझीलंड,आँस्ट्रेलिया,इंग्लड..अशा सर्वच प्रतिस्पर्ध्याविरूध्द त्यानं कौतुकास्पद कामगिरी केली. केवळ आपल्या धावा वाढवण्याकडं अथवा फक्त कारकीर्दीकडं सचिननं कधीही लक्ष दिले नाही.संघ अडचणीत असतांना एक खांबी तंबूसारखा मैदानावर थांबणारा सचिन टीम इंडियाला नेहमीच आधार वाटलायं. किंबहुनां त्यांच्या सर्वीत्तम खेळीनंच भारतीयाला अनेकदा विजय मिळवून देत हे सिध्दही केलंय. दहा,पंधरा हजारांनंतर ५ नोव्हेंबर२००९ ला त्यानं पुर्ण केलेल्या १७हजार धावा हे त्यांच्या खेळाचं वेगळेपण म्हणता येईल.

सचिन आता थकलाय,त्यानं निवृत्त व्हावं या सल्लाला सचिननं एकदिवसीय सामना,कसोटी असो की टवेंटी-२० अशा सर्वच सामन्यात सर्वीत्तम खेळ करत चोख प्रत्युत्तर दिलंय. सचिन आपल्या मित्रपरिवारात तेंडल्या,लिटल चॅम्यियन्स या टोपन नावानं ओळखला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी आहार त्याला घ्यायला आवडतो. मराठीबरोबरच इंग्रजी,हिंदी भाषा त्याला येतात. साहस,रहस्यमय कथा वाचण्यांबरोबरच चित्रपट पहायला त्यांला आवडते. जुनी गाजलेली हिंदी,मराठी गाणी ऐकणे हा त्यांचा छंद आहे. याशिवाय स्कुबा डायव्हींगसह साहसी खेळात सहभागी व्हायला त्याला नेहमी आवडते.

अनेकदा भारतीय संघातल्या सहकाऱ्यांबरोबर हे खेळ खे्ळायला तो प्राधान्य देतो. विश्व विक्रमांचे डोंगर रचणाऱ्या सचिननं गर्व,अहंकाराला आपल्यापासनं दूरच ठेवलंय. आक्रमकतेपेक्षा संयमाला प्राधान्य द्यायला त्याला आवडते. क्रिकेटरसिकांना त्यांच्या खेळातून हा प्रत्यय नेहमीच आलायं. सचिन कुंटुबवत्सलही आहे. क्रिकेटचा दौरा नसेल त्यावेळेस आपला जास्तीत जास्त वेळ तो कुटुंबास देतो. आपल्या कारकीर्दीचा २० वर्षाचा टप्पा त्यानं गाठलायं. सचिननं कायमच खेळत राहावे,विक्रमाचे असेच डोंगर रचावेत अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

Sunday, October 11, 2009

राज,उध्दवची कम्युनिटी वाढतेय
शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे निगर्वी,सालसं आणि ध्येय निश्‍चीत करून शांतपणे मार्गक्रमण करणारा नेता... तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोख ठोक भूमिका मांडणारा,काहीसा संतापी परंतु आपल्याला हवी असलेली कृती करूनच घेणारे,ती करण्यासाठी भाग पाडणारे,ध्येयवादी व्यक्तीमत्व म्हणून परिचित......ही दोन्ही व्यक्तीमत्व चालणं,बोलणं,वागण्यापासून सर्वच बाबतीत भिन्न. त्यांच्याप्रमाणंच त्यांचे चाहतेही अर्थात "फॅन्स'भिन्न असणं स्वभाविक आहे. राज आणि उध्दवच्या चाहत्यांची स्वतंत्र कम्युनिटी असून या कम्युनिटीवरील सदस्यां(मेंबर)च्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या दिड-दोन महिन्यांत आपण विविध संकेतस्थळाच्या कम्युनिटीवर नजर टाकल्यास निवडणूकींमुळे सदस्य संख्येचा आलेख वाढता वाढता वाढे...असाच राहिला आहे हे लक्षात येईल.राज्यातले कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवायचाच. हे ध्येय शिवसेना-भाजपा युतीने समोर ठेवला आहे. त्याचदृष्टीने प्रचाराची रणनिती निश्‍चीत करत युतीचा राज्यभर प्रचार सुरु आहे.
दुसरीकडे नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणूकीत नवे असूनही चांगले यश मिळवले. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेत घवघवीत यश पक्षाला मिळेल. किंबहुना कोणत्याही पक्षाला मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्‍य नाही,ंअसा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आहे. प्रचारासाठी केवळ तिनच दिवस शिल्लक राहिल्याने जास्तीत जास्त भागात प्रचारासाठी जाण्यावर युती आणि मनसे नेत्याचा भर आहे. मतदानाच्या दिवशीचे मतदान आणि मतमोजणीनंतरचा कौल हे अद्याप दूर आहे. असे असलेतरी राज आणि उध्दवचे फॅन त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे शक्‍य नसल्याने स्क्रॅंप,चॅटींगद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. राज आणि उध्दव यांना आपल्या फॅनसला उत्तर देणं हे सध्याच्या निवडणूका रणधुमाळीत आजमितीस शक्‍य नाही. पण आपल्या फॅनचा हिरमोड होऊ नये. तसेच आपण त्यांच्या संपर्कात आहोत. हे दाखवण्यासाठी शिवसेना,मनसेने स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्यांच्या प्रश्‍नांना उत्तर दिले जाते. त्यांच्या सूचना,शुभेच्छा,प्रस्ताव स्विकारले जात आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फक्त आँकुर्टवरील कम्युनिटीचा विचार केला तर ही कम्युनिटी बरीच जुनी आहे. राज ठाकरे एमएनएस(18हजार234 सदस्य),राज ठाकरे मराठी हदयसम्राट(26,512)राज आँकुर्ट सेना(12,438),राज ठाकरे एक वादळ(11हजार908) याशिवाय फक्त राज ठाकरे नावाचे स्वतंत्र पाच फॅन्स क्‍लब असून त्यांच्या सदस्यांची संख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. "मुंबई आहे मराठी माणसाची, नाही कोणाच्या बापाची....ज्यांनी लावली महाराष्ट्राची वाट, ते काय आणणार नवीन पहाट,सत्तेसाठी सातशे साठ,महाराष्ट्रासाठी एकच मराठी हदयसम्राट राज ठाकरे...यासारखे संदेश कम्युनिटीवर फॅन्स क्‍लबने दिलेले आहेत. मनसेची "डब्लू डब्लू मनसे ओराजी" ही स्वतंत्र वेबाईट आहेत त्याचे1हजार454 सदस्य आहेत."महाराष्ट्राचा सन्मान राखा,आम्ही तुमचा मान ठेवू,अन्यथा तुम्ही जाता तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा...आपला मुंबईकर असा संदेश दिलेला दिसतो. मनसे विद्यार्थी सेनेचे1हजार272 सदस्य आहेत. "जगाला हेवा वाटेल,असा महाराष्ट्र घडवूया' हे राज ठाकरेंचे आवाहन युवकांसाठी ठळकपणे दिले आहे. याच आवाहनाला युवकांनी प्रतिसाद देत मनविसेच्या झेंड्याखाली अनेक युवक एकत्र झाल्याचे त्यांच्या फॅन्स क्‍लबच्या वाढत्या संख्येहुन लक्षात येत आहे.राज ठाकरेंप्रमाणेच शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंही आपल्या फॅन्सच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या दैनंदिन नियोजनावरून दिसते. आँकुर्टवर उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे मोठे सहा ग्रुप आहेत. या ग्रुपच्या सदस्यांची संख्या सात ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. यातलाच सातवा फॅन्सचा ग्रुप हा बाळासाहेबांबरोबर असलेल्या राज उध्दव यांना माननारा आहे. या ग्रुपचे सदस्य कमी असलेतरी त्यांचे संदेश लक्ष वेधतात. उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे संदेशही वेगळेपण जपणारे आहे. एका चाहत्यांने युतीच्या नव्या सरकारची अपेक्षा व्यक्त केलीय. तो म्हणतो"येणार या महाराष्ट्रात आता शिवशाही येणार,आता ज्यांची वेळ भरली, त्यानेच आडवे यावे,उध्दव ठाकरे...आपल्या काका-मामाची मिमिक्री करून मोठा झालेला हा नेता नव्हे, या नेत्याकडे स्वतःची ओळख आहे,ताकद आहे... असं वर्णन आहे. काहीं चाहत्यांना उध्दव हे चांगले राजकारणी आणि महाराष्ट्राला दिशा देणारे नेते वाटतात.काहींनी राजकारण हा त्यांचा पिंड नाही, ते लाजाळू आणि शांतपणे एकांतात रमणारे कलाकार आहे, त्यांची आपली फोटोग्राफी कला जोपासावी असे वाटते तर काहींना बाळासाहेबानंतरचा चांगला नेता म्हणून तेच योग्य असल्याचं वाटते.राज आणि उध्दवच्या या कम्युनिटवर चाहत्यांनी आपआपल्यापध्दतीने संदेश नोंदवत आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत. या दोन्ही नेत्यांना हे संदेश भविष्यातल्या राजकारणाला भरारी,प्रोत्साहन देणारेच ठरतील यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपली कम्युनिटी अपडेट ठेवण्याबरोबरच वेबसाईटही अपडेट ठेवण्यावर भर दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या फेसबुक,हाय फाय,व्हॅंनसारख्या कम्युनिटीवरही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन सभा,वार्ताकंनाच्या बातम्या,ठळक नोंदणी, मान्यवरांचे संदेश,छायाचित्र,व्हीडीओशुटींग सर्व काही उपलब्ध करून दिलेले दिसते. त्यासाठी आयटी क्षेत्रातला स्वतंत्र ग्रुपच तिथे काम करतो आहे. हे नमूद करावेसे वाटते.--- वुई हेट राज ठाकरे
....महाराष्ट्र नवनिर्माणचे स्वप्न पाहणाऱ्या किंबहुना त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंना पाठींबा देणारा स्वतंत्र वर्ग जगभर आहे. तसा त्यांचे विचार न पटणारा,त्यांचा विचारांना विरोध करणारा वर्गही असल्याचं जाणवते. त्यांना विरोध दर्शवणाऱ्या आँकुर्टवर वुई हेट राज ठाकरे(1हजार539सदस्य),आय हेट राज ठाकरे(1हजार156)आँल हिंदुस्थान हेट राज ठाकरे(831सदस्य) या कम्युनिटी आहेत. त्यांच्यावर आपआपल्यापध्दतीने संदेश देण्यात आले आहे."वुई सपोर्ट राज ठाकरे या कम्युनिटीवरील1हजार 219 सदस्यांनी राज ठाकरेंच्या बाजूने आहेत. त्यांच्या विचाराने हे सदस्य प्रेरीत झालेले दिसतात

कुणी आपला... कुणी परका...एकाच माळीचे मळी

आपला....कुणी परका....सगळे एकाच माळीचे मणी...
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली. पण देश,राज्यातले गरीबी निर्मुलन, महागाई,भ्रष्टाचार,बेकारी यासारखे अनेक प्रश्‍न जैसे थे आहे.उलट दिवसागणिक या प्रश्‍नांची संख्या वाढत आहे. भूकेल्यांसाठी अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहेत. या गरजा सोडवण्यासाठी केंद्र-राज्यांच्या योजना अनेक आहे. त्याचे नियोजन नसल्याने यशस्वी अमंलबजावणी होत नाही. त्यात अनेक पळवाटा आहेत त्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच राहतांना दिसतात....सरकारची टर्म संपते...पाच वर्षानी निवडणूका येतात....पुन्हा तेच पक्ष,तेच नेते...बेकारी,भ्रष्टाचार,गरीबी दुर करण्याची तीच पोकळ अश्‍वासने...सोडवण्याचे काही नियोजन नाही.....सारं काही तेच तेच मग मतदान करायचे कशासाठी असा प्रश्‍न नागरीकांना पडला तर त्यात नवल नाही.... होय हे खरं आहे पक्ष,नेत्यांबद्दल असलेला संताप त्यांच्या संवादातून जाणवतो...केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातल्या विविध जिल्ह्यात आलेले चाकरमानी मतदानासाठी आपल्या गावी न जाण्याचा प्रश्‍न यंदाही ऐरणीवर आहे.राज्य घटनेने प्रत्येक नागरीकांला मतदानाचा हक्क दिला आहे. या आपल्याला मिळालेल्या हक्कांचा योग्य वापर करून पात्र उमेदवार निवडून देणे आवश्‍यक आहे. नागरीकांनी मतदान करावे.यासाठी निवडणूक आयोगापासून विविध सामाजिक संस्था,मंडळे,वृत्तपत्र समुह जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन करतात. या आवाहनालाप्रतिसाद देत अनेक नागरीक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. पण समाजात असाही एक वर्ग आहे की,ज्याला राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार,घोषणा याबद्दल काही देणे घेणे नाही. हा वर्ग आपल्या व्यवसाय,कामातच अधिक लक्ष देतो. यात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित नागरीकांचाही तितकाच सहभाग असतो असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळं स्वभाविकच मतदान कमी प्रमाणात होते. गेल्या काही वर्षातल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला मिळालेला हा मुलभूत हक्क नागरीक का नाकारतात...याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोलण्यातून हे जाणवते. मुंबईत पनवेल भागात उपहारगृह चालवणारे किसन तेलुरे,सुलोचना तेलुरे हे दाम्पत्य मुळचे बिड जिल्ह्यातले. गेल्या बारा वर्षापासून ते मुंबईत आहे. पण एकदाही मतदान करण्यासाठी आपल्या गावी गेले नाही अथवा मुंबईतही मतदान केले नाही. गावाकडे असतांना केव्हातरी मतदान करायचे पण आता टाळतात. पक्ष,नेत्यांबद्दल त्यांच्या मनात चिड आहे. निवडून कुठलाही पक्ष येवो, काही फरक पडत नाही, महागाई,बेकारी वाढते आहे. सर्व सारखेच आहे असं त्यांना वाटते. कळंबोली कॉलनीतला गफूर सैय्यद बुलढाण्याचे आहे. भंगारव्यवसाय सुरु करून त्यांनी आपला जम बसवला आहे. सैय्यद परिवाराला निवडणूक,राजकारण हे विषय आवडत नाही. आपले प्रश्‍न आपल्यालाच सोडवावे लागणार आहे त्यासाठी नेते,पक्ष थोडेच येणार आहे, त्यामुळे मतदान वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. निवडणूकीपुरते पक्षाचे नेते येतात,अश्‍वासन देऊन निघून जातात आणि नंतर कधी फिरकत नाही. त्यामुळं मतदान नकोच असे गफूरभाई सांगतात. याच भागातले हातगाडीवर व्यवसाय करणारे राजाराम जाधव हे मूळचे धुळ्याचे. त्यांनाही राजकारणबद्दल प्रचंड चिड आहे. पक्ष,नेते म्हणजे ढोंगीपणा आहे.ढोंग करून सत्ता,पैसा मिळवायचा आणि त्यांचा उपयोग आपल्या परिवारासाठी करायचा असे त्यांचे म्हणणे आहे. आपला व्यवसाय बंद ठेवून मतदान करण्यासाठी गावाकडे जाणे त्यांना पसंत नाही. नावडे भागातल्या एका पतसंस्थेत काम करणाऱ्या ललित शुक्‍ल या सुशिक्षित युवकांच्या भावना तीव्र आहे. स्वातंत्र्याला साठ वर्ष पुर्ण झाली. पण देश,राज्यातले मुलभूत प्रश्‍न काही सुटले नाही, उलट बेकारी,महागाई,भ्रष्टाचार वाढला. या सर्व बाबींना पक्ष,नेतेच जबाबदार आहे. त्यामुळे भारताचा पुरेसा विकास झालेला नाही असं त्याला वाटते. सध्या राजकारणात नेतेमंडळीच्या परिवारतल्या प्रवेशाबाबत त्यांना नापसंती व्यक्त केली. या काही प्रातिनिक प्रतिक्रीया आहेत. पण समाजात असे अनेक घटक आहे. त्यांना राज्यकर्ते,नेते,पक्ष त्याचे विचारांबद्दल अनास्था आहेत. यात विशेषतः सामान्य नागरीकांबरोबरच बाहेरगावाहुन आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मतदान करण्याबद्दल जनजागृतीचे प्रयत्न अधिक व्हायला हवेत. मतदानापासून दुर राहणारा हा वर्ग मतदानाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी सरकारदरबारी अधिक प्रयत्न व्हावेत असाही सूर व्यक्त होऊ लागलायं. नागरीकांत नेते,पक्षाबद्दल अनास्थेची भावना निर्माण होणे हे चूकच आहे. त्यासाठी नेते,पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची आज गरज आहे असे वाटते.

Thursday, June 25, 2009

रबडी महात्म्य ढोली आणि ठेपला

वेळ पहाटे चार साडेचारची...ठिकाण अबू रोड अर्थात माऊंट अबू रेल्वेस्टेशन...रणकपूर एक्सप्रेस स्थानकावर थांबते आणि बाहेर एकच गोंधळ सुरु होतो...साहब ले लो अबू की फेमस रबडी...एक बार लेंगे तो बार बार मागोंगे..मुक्त मै घर ले जायेंगे...पसंद आयी तो दोन बार आयेंगे..अच्छी नही लगी तो दाम ले जावोंगे...यासारख्या विक्रेत्यांच्या घोषणांनी प्लॅटफार्म गजबजून जातो....कुल्लाहात असलेली रबडी...प्रत्येक बोगी आणि खिडकीजवळ जाऊन विक्रीचा त्यांचा सपाटा सुरु होतो...प्रवाशांना पटवून रबडीचा कुल्लाह त्यांच्या हातात देत पैसे घेतल्यानंतरच विक्रेत्याचं समाधान होते...एवढ्या पहाटेही विक्रीचा हा अनोखा फंडा लक्षात घ्यावा असाच वाटला...इंटरनॅशनल मिडीया कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्या राहणीमानाबरोबरच अस्सल खवैय्यगिरी जपणारेही अनेकजण पहायला मिळाले.
बारा पंधरा तासांच्या प्रवासानंतर अबू स्टेशनवर पहाटे उतरलेल्या कुठल्याही प्रवाशाला आपला थकवा दूर करण्यासाठी चहा प्यावासा वाटेल. त्यातही महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल तर ती रबडीपेक्षा चहालाच अधिक प्राधान्य देईल. त्याप्रमाणे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. पण पहाटेची वेळ असूनही संपुर्ण स्टेशनवर आम्हाला कुठेच चहा मिळाली नाही. विक्रेत्यांकडे चहाबद्दल विचारणा केली तर ते तिरस्काराच्या भावनेनंच आमच्याकडे बघत.
काही विक्रेत्यांनी तर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत इतर ग्राहकांना रबडी देणं पसंत केल. स्टेशनवर सर्वत्र रबडी विकली जात होती. आमच्यापैकी काहींनी चाय नही तो रबडी सही...असं म्हणतं रबडी खायचं ठरवलं तर काहींनी रबडी आणि एवढ्या पहाटे असं म्हणतं खाण्यास नकार दिला. दहा रूपये देत रबडी घेत काहींनी स्वाद चाखायला सुरुवात केली. त्यांनी रबडी घेतल्यानंतरही विक्रेता समोर जाण्यास तयार नव्हता. तो आपल्या खास शैलीत रबडी महात्म्य सांगत इतरांना आग्रह करत होता. अखेर आम्हांलाही त्यानं रबडी घेण्यास भाग पाडले...आणि आम्ही पहाटेच्या वेळी चाखलेली रबडीची चव खरोखरच लक्षात रहावी अशीच होती...याबद्दल विक्रेता आणि सुरवातीस रबडी खाणाऱ्यां मित्रांचे आभार मानावे तेवढे थोडेच..त्यांचे चाय नही तो रबडी सही... हे वाक्यही माझ्या लक्षात राहिले.
पाच दिवसीय परिषद आटोपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रजापिता ईश्वरिय विश्वविद्यालयातर्फे आम्हाला मका चिवडा,शंकरपाळे पाकिट आणि काजू बर्फी ही ईश्वरीयभेट म्हणून देण्यात आली. या भेटीलाच ढोली अर्थात एकत्रित प्रसाद म्हणतात हे आम्हाला पाहिल्यांदा समजलं. सहभागी प्रतिनिधींना प्रवासात सहभोजनासाठी पुरी,खाकरा,बटाटा चिप्स आणि त्याजोडीला लोणच्याचे विविध प्रकार असलेले पाकिट देण्यात आले. या खानासुमारीला ठेपला असं म्हणतात. रबडीवगळता ढोली,ठेपला ही वाक्ये आमच्यासाठी नवीनच होती...या सर्व नव्या खाद्यपदार्थाचा परतीच्या प्रवासात आम्ही आस्वाद घेतला..या पदार्थाची चव ओठावर ठेवतच आम्ही घरी परतलो पण राज्य बदलल्यानंतर जात,धर्म,पंथ आणि खानपानही बदलते आणि ते कसं असू शकत याचा प्रत्यय आम्हाला राजस्थान जयपूर दौऱ्यादरम्यान आला...

Tuesday, June 23, 2009

ओमशांती...थिंक ओव्हर इट

मै एक आत्मा हु...ज्योती बिंदू स्वरूप आत्मा हु...आप के मस्तिष्क के बाजू मै ब्रुगटीके पास मेरा वास्तव है....हम सब परम् परमात्मा की संतान है...यासारखे काहीसे जड परंतु अध्यात्मिक शब्द कानावर पडले की,क्षणभर कुणालाही ही काय भानगड आहे. असंच वाटणं स्वभाविक आहे. पण ही भानगड वगैरे काही नाही, तर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत असलेल्या भारतात अध्यात्मिक विचाराचा डोस(संदेश) देण्याचा एक प्रकार म्हणता येईल. एक अध्यात्मिक चळवळ म्हणून परिचित असलेल्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे माऊंटअबू राजस्थान इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी इनर इम्पावरमेंट आँफ मिडीया पर्सन ही राष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेत ओम शांती....या वरील डोसची जणू अनुभूती आली.
जगात धर्म,जात,मुर्तीपूजा,पंथ वगैरे काही नाही. मनुष्य हा देखील फक्त निमित्तमात्रा आहे. तो जे काही काम करतो,चालतो,बोलतो,लिहितो,वाचतो या सर्व कृती त्यांच्या आत्म्याकडून होतात. आत्माच मनुष्याकडून सर्वकाही करून घेत असतो. असं सांगणारं हे विश्वविद्यालय. देशविदेशात आठशेहुन अधिक केंद्र आणि जवळपास आठ हजारांहुन अधिक बीके(ब्रम्हाकुमार,ब्रम्हाकुमारी)च्या माध्यमातून चालणारे काम सर्वांनाच थक्क करून सोडणारे आहेत. मला दुसऱ्यांदा या मिडीया कॉन्फरन्सला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं हे विश्वविद्यालय अधिक जवळून समजून घेता आलं.

यंदाच्या परिषदेसाठी प्रसारमाध्यमातल्या कर्मचाऱ्याचे अंतरिक सक्षक्तीकरण हा मुख्य विषय ठेवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने विविध विषय चार दिवस चर्चेले गेले. त्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीची आत्मानुभूती, प्रतिनिधीची अधात्मिक ज्ञान, त्यातला सहभाग आणि अध्यात्मिक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन, प्रसारमाध्यम क्षेत्रात यशस्वी होण्यासाठीची सुत्र,आनंद प्राप्तीसाठी परमेश्वराशी एकरूपता,जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंतरिक शक्तीची आवश्यकता,सक्षम प्रसारमाध्यमे समाजासाठी प्रेरक,समय की पुकार या सारख्या विषयांचा समावेश होता. याशिवाय चारही दिवस पहाटे चार ते साडेपाच पर्यत विपश्यना,ध्यानधारणा होत असे. त्यानंतर साडेसहा ते साडेआठ यावेळेत राजयोगावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या चार दिवसीय परिषदेसाठी देशभरातून नावाजलेल्या प्रिंट,इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक,वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. सहभागी वक्तेही संबंधीत विषयाचे तज्ञच होते. त्यामुळं प्रत्येक चर्चाही खुलेपणे आणि बारीकसारीक मुद्यांवर होत असे. पण सर्वच तज्ञ विश्वविद्यालयाशी संबंधीत असल्यानं चर्चेचा सूर हा विश्वविद्यालयांनं आखून दिलेल्या चौकटीत आणि प्रत्येक विषयात अध्यात्मिक टच दिलेला असल्याचे जाणवले.
पहिल्या दिवसाचा शानदार उद्घाटन सोहळा.समारोप समारंभही भव्यदिव्य असाच,त्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमानं परिषद संस्मरणीय झाली.परिषदेच्या निमित्तानं प्रतिनिधींना विश्वविद्यालयानं माऊंटअबूवरील नक्कीलेकसह त्यांच्या उपक्रमांपैकी गोल्बल हॉस्पिटल,पांडव भवन,युनिव्हर्सल हॉल,शांती भवन,म्युझियम,पिस पार्क दाखवले. वर्षभर रावबण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहीती दिली.
आरवली पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या आणि ब्रम्हाबाबांनी स्थापन केलेल्या या ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम निश्चितच चांगला आहे. दरवर्षी विविध क्षेत्रातल्या व्यक्तींनी एकत्र आणून त्यांच्या क्षेत्रातल्या बदलांची माहीती देण्याबरोबरच अध्यात्मिक टच देण्याचा प्रयत्न केला जातो. तिथलं निसर्गसौदर्य पाहण्याबरोबरच आदरातिथ्यापासून इतर सर्वचबाबतीतल्या नियोजनाचा इतरांनी आदर्श ध्यावा असाच आहे. हे जरी खरं असलंतरी मला परिषदेत खटकलेले काही मुद्दे अनुत्तरीतच राहिले. त्यात कुठलाही धर्म,जात,पंथ,मुर्तीपूजा न मानणाऱ्या या विश्वविद्यालयालयात प्रतिमापूजनाला स्थान आहे, जगात देव नाही आपला आत्मा सर्व काही करून घेतो , ब्रम्हदेवानं विश्वाची निर्मिती केली आहे म्हणून ब्रम्हा बाबा हेच परमपिता, श्रीकृष्णाने गीता सांगितली नाही,अर्जुनाचे अनुकरण स्वइच्छेवर, संत ज्ञानेश्वर,शंकराचार्यांनी ज्ञानोपदेश केला नाही यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. प्रत्येक धर्माची शिकवण सदाचार,सत्य,अहिंसेची मग जगात धर्मच नसल्याचे विश्वविद्यालयाचे म्हणणे कितपत योग्य, जगभर पसरलेल्या विश्वविद्यालयाच्या कारभारासाठी आर्थिक मदत संयुक्त राष्ट्र संघासह इतरांकडून केली जाते. याशिवाय विश्वविद्यालयाच्या कार्यासाठी पुर्णवेळ वाहून घेतलेले बीके अर्थात ब्रदर्स अँन्ड सिस्टरर्स आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज जगभर परमपिता ब्रम्हाबाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला जात आहे....हे जरी खरं असलं तरी काही प्रश्न हे अनुत्तरितच राहतात. परिषदेदरम्यान मी संयोजकांशी या विषयावर चर्चा करण्याचा,शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.....विश्वविद्यालयाचा आठ दिवसांचा कोर्स करा मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळतील...एवढंच सांगण्यात आलंय....अखेर हे अनुत्तरित प्रश्नच मनात ठेवून मी पुन्हा नाशिकला परतलो...

Tuesday, June 9, 2009

(टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू व पंच कमलेश मेहता यांनी सकाळ साम टिव्हीला विशेष मुलाखत दिली. ही मुलाखत सकाळच्या सर्व आवृत्यांसह ई सकाळवर प्रसिध्दी झाली. माझ्या मित्रांना वाचनासाठी पुन्हा देत आहे....)
खेळाडू विकासासाठी क्रीडा धोरणाची योग्य अंमलबजावणी हवी
श्रीकृष्ण कुलकर्णी
मुंबई - दरवर्षी केंद्र, राज्य शासन क्रीडा विकास डोळ्यांसमोर ठेवून आपल्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करते. ही रक्कम मोठी असल्याने त्याच प्रमाणात घोषणाही केल्या जातात; पण या तरतुदीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी निश्‍चित केलेला निधी कितपत खर्च होतो की तसाच राहतो, हे कुणालाही समजत नाही. त्यासाठी शासकीय स्तरावर योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. अशी अपेक्षा टेबलटेनिसचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक कमलेश मेहता यांनी व्यक्त केली. सध्या सर्वच खेळाडू विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. सरकारचे योग्य पाठबळही मिळायलाच हवे, असेही त्यांनी नमूद केले.


जलतरणपटू वीरधवल खाडे याने कर्नाटककडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर कमलेश मेहता यांची माटुंगा जिमखाना येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वीरधवलच्या निर्णयाबरोबरच इतर विषयावर 'साम मराठी'शी संवाद साधला. केंद्र, राज्य शासनाचे क्रीडा धोरण हे खेळाडू विकास डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवे. केवळ अंदाजपत्रकात भरीव तरतुदी करून भागणार नाही. तसेच योग्य तरतुदीबरोबरच अंमलबजावणी होण्यासाठीही नियोजन केले पाहिजे. आमच्या वेळी विशेष पुरस्कार वगैरे काही नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश नोंदविल्यानंतर कधी तरी सत्कार केला जाई. मला तर एकदाच रोख रक्कम मिळाली होती. आज सर्वच क्रीडा प्रकारांत नामवंत खेळाडू पुढे येत आहेत. आपल्या कामगिरीने महाराष्ट्राचा नावलौकिकही वाढविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत; पण त्यांच्या या कामगिरीच्या तुलनेत त्यांना देण्यात येणारी रक्कम इतर राज्यांच्या तुलनेत फार तुटपुंजी आहे. त्या बक्षिसांच्या रकमेत वाढ व्हायला हवी.समस्यांच्या गर्तेत खेळाडूते म्हणाले, "प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, क्रीडा संस्था, क्‍लबची संख्या वाढली आहे. या संस्था, क्‍लबकडे पुरेसे साहित्य नाही. खेळाडूही उपलब्ध होत नाहीत. संस्था, क्‍लबच्या स्तरावर चांगली वातावरणनिर्मिती होत आहे; पण महागडे क्रीडासाहित्य आणि संस्था, क्‍लबचे शुल्क देणे खेळाडूंना परवडत नाही, त्यामुळे काही खेळाडू स्वतंत्रपणे खेळण्यास प्राधान्य देतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. शासन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून या सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन खेळाडूंना उपलब्ध करून देऊ शकते. फक्त क्रीडा खात्याने कामाची मानसिकता बदलून खेळाडूंचा हुरूप वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''शेवटी कौटुंबिक जबाबदारी महत्त्वाचीकुठलाही खेळाडू हा लहानपणापासून एखाद्या खेळाची निवड करून त्यात नैपुण्य मिळवतो, असे सांगत ते म्हणाले, बारा-पंधरा वयापर्यंत खेळल्यानंतर त्याला बक्षिसे मिळतात. तो प्रसिद्धीच्या झोतात कायम राहतो. त्यामुळे त्यांचा हुरूप जरूर वाढतो; मात्र सतरा-अठरा वर्षांनंतर त्यांना नोकरीचे वेध लागतात. कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने आपल्याला खेळांच्या माध्यमातून नोकरी मिळावी, असे त्यांना वाटते. यात चूकही काही नाही; पण त्यांना नोकरी मिळत नाही. आज एअर इंडिया, बॅंका, पोलिस, रेल्वेचा अपवाद वगळता इतर ठिकाणी खेळाडूला नोकरीची संधी नाही. सरकारी पातळीवर तर पूर्णपणे अनास्था आहे. सर्वच खेळाडूंना नव्हे; पण राष्ट्रीयस्तर गाजविणाऱ्या खेळाडूंच्या नोकरीचा प्रश्‍न मार्गी लावल्यास इतरही खेळाडू क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होण्यास मदत होईल, असे वाटते.


अपेक्षापूर्ती हवी, अपेक्षाभंग नको...सरावासाठी योग्य मैदान, चांगला खेळ होण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक, कुटुंब उदरनिर्वाहासाठी नोकरी, खेळाच्या आर्थिक मदतीसाठी प्रायोजक... अशा काही समस्या प्रत्येक खेळाडूंच्या आहेत. किंबहुना सर्वच खेळाडू हेच मुद्दे लक्षात घेऊन आपल्या खेळाची निवड करतात. चांगली कामगिरी बजावितात. त्यामुळे त्यांच्या क्‍लब, संस्था आणि शासनाकडून अपेक्षा वाढतात. आपल्या मागण्या क्‍लब, शासनाने ऐकूण घ्याव्यात. त्याप्रमाणे अंमलबजावणी करून आपल्याला चांगली मदत करावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटते. खेळाडूंच्या अशा अपेक्षांची पूर्तीच व्हायला हवी. उगीचच पोकळ अश्‍वासने देऊन खेळाडूंचा अपेक्षाभंग करू नये, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

Wednesday, June 3, 2009

दातृत्व आणि सचिन

आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हा उदात्त हेतू समोर ठेवून गरीब, पिडीतांसाठी मदत करणारे आणि कायम प्रकाशझोतात राहणाऱ्यांची संख्या मोठीच. मात्र गाजावाजा न करता इतरांना सतत मदत करणारी व्यक्ती म्हणजे आपला लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.... त्यानं 'गिव्ह इंडिया' या संस्थेला गरीब, पिडीतांसाठी ७० हजार ७०० रूपयांची मदत केलीय. याशिवाय दोनशे अनाथ मुलांचा शिक्षण, पालनपोषणाचा खर्चही तो उचलणार आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं गिव्ह इंडिया ही संस्था गेल्या नऊ वर्षापासून काम करतेय. ही संस्था मुंबई,दिल्ली मॅरेथाँनचं यशस्वी नियोजन करते. तसंच त्यातून जमा होणारा निधी विविध स्वयंसेवी संस्थांना गरिब,पिडीत कुटुंबांसाठी उपलब्ध करून देते. गिव्ह इंडिया या संस्थेतर्फे यंदा२७सप्टेंबर ते तीन आँक्टोबर या कालावधीत देणगी द्या आणि आनंद मिळवा अर्थात जॉय आँफ गिव्हींग विक हा आठवडा पाळला जाणार आहे. या आठवडयात लहान मुलं,कुटुंब,पालक,पिडीतांना समोर ठेवून विविध कार्यक्रम होणार आहे.
सचिननं मदत देत या आठवड्यांची औपचारिक सुरवात केलीय. समाजात गरिब,पिडीत माणसांची संख्या मोठी आहे. पण त्यांच्यासाठी काम करणारे कमी आहेत. एक भारतीय नागरीक म्हणून इतरांसाठी मदत करणं हे आपलं कर्तव्यच असल्याचं त्यानं सांगितलं. इतरांना मदत करण्याची प्रेरणा आपल्याला वडील आणि पत्नी यांचेकडून मिळाली.असं सांगायला तो विसरला नाही.
वंचितांसाठी काम करायला वेळ कुणालाच नाही. पण सहानुभूती ठेवून अन्न,कप़डे,प्राथमिक उपचारांसाठी मदत आपण करू शकतो.असं अभिनेत्री नंदिता दास हिनं सांगत. वंचितांसाठी प्रत्येक व्यक्तींन मदत करून खारीचा वाटा उचलावा.असं आवाहन तिनं केलं.
मदत करण्याची इच्छा असूनही केवळ योग्य व्यासपीठ न मिळाल्यानं अनेकजण देणगी देणं टाळतात. याच लोकांना समोर ठेवून ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणाऱ्या गिवनं इंडियानं वंचित,पिडीतांसाठी घेतलेला पुढाकार घेतलाय. देणगी द्या आणि आनंद घ्या...अशा घोषवाक्यांद्वारे संस्था पुढे आली. बघूया या संस्थाना दात्यांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतो