Sunday, March 7, 2010

मथुरेतली कपडा फाड होली...


होळी हा पारंपारिक सण ठिकठिकाणी आपापल्या पद्धतीनं साजरा होतो. याला अर्थातच श्रीकृष्णाची मथुरानगरीही अपवाद नाही. मथुरेत हा उत्सव तीन-चार दिवस चालतो. धुलीवंदनानंतरचा हा दिवस`कपडा फाड होली` म्हणून परिचित आहे. यात महिला पुरुषाचे चक्क कपडे फाडतात...आपला विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे...
आपल्याकडे देश-प्रांतभागानिहाय सण,उत्सव साजरे करण्याची वेगळी परंपरा आहे. होळी,धुलीवंदन,रंगपंचमीसारखे सण म्हणजे नागरीकांच्या उत्साह,आनंदाला उधानच येते. श्रीकृष्णाच्या मथुरेसह इतर प्रांतात होळी,धुलीवंदनापासून सुरु होणारे हा उत्सव ४५ दिवस चालतो.
स्थानिक उत्सव समिती होळीच्या दिवसापासून रंगपंचमीच्या दिवसांपर्यत विशेष नियोजन करते. जास्तीत जास्त नागरीकांना या उत्सवात सहभागी करून घेतले जाते. मथुरावासिय सहकुटुंब या उत्सवात सहभागी होतात. सध्या तिथं हा अनोखा रंगोत्सव पहायला मिळतोय. त्यासाठी स्थानिक समितीनं दहा हजार किलो रंग उपलब्ध करून दिला आहे.
एकमेकांना रंग लावून तसेच या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
होळी,धुलीवंदनानंतरचा दिवस हा कपडा फाड होली म्हणून परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून मथुरावासिय हा दिवस कपडा फाडदिन म्हणून साजरा करतायं. महिला पुरुषांना रंग लावण्याबरोबरच त्यांचे चक्क कपडे ओढतात,फाडतात आणि त्यांना नखशिखांत भिजवतात. भगवान श्रीकृष्ण बलरामासोबत हा उत्सव पाहण्याचा आनंद घेतात. या दोघांच्या आनंदासाठीच हा नटखट,छेडछाडीचा उत्सव असतो.अशी येथील नागरीकांची श्रध्दा आहे.
या अनोख्या कपडा फाड होळीची ख्याती जगभर पसरलीय अनेक परदेशी पर्यटकही हा आगळावेगळा होलीत्सव पाहण्यासाठी आवर्जुन हजेरी लावलात. एवढंच नव्हे तर आपल्या कॅमेऱयात ही दृश्य बंदीस्त करतात.

Friday, February 19, 2010

आणि रिक्षाचालक बनला हायटेक

चेन्नईतल्या सॅमसन हा रिक्षाचालक परदेशी पाहुण्यांसाठी जवळचा मित्र बनलाय. त्यानं स्वतःच संकेतस्थळ तयार केलंय. इंटरनेटवरून नोंदणी करण्याबरोबरच मोबाईलवरून संपर्क साधल्यास तो सेवा देतो. याशिवाय पर्यटकांच्या एसएमएसलाही त्याच्याकडून त्वरीत प्रतिसाद मिळतो
१९९७ मध्ये चेन्नई दौऱ्यावर आलेल्या एका ब्रिटीश परदेशी पाहुण्यानं सॅमसनच्या रिक्षात बसून चेन्नई फिरण्याचा आनंद घेतला. याच प्रवासादरम्यान परदेशी पाहुण्यानं सॅमसनला इंग्रजी भाषा शिकण्याचे तसंच ग्राहकाला कस तयार करायचा याबाबतच्या काही टिप्स दिल्या.अर्थात सँमसनही या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत नंतरच्या तीन वर्षात इंग्रजी भाषा अवगत केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं एका जपानी पर्यटकांच्या इंटरनेटवर आपला ई-मेल आयडी तयार केला. त्यांच्या मेलला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानं पुढे२००६ मध्ये ब्रिटीश पर्यटकाच्या माध्यमातून ट्युकटेस्टींक डॉम कॉम नावाचं संकेतस्थळ तयार केले आणि चेन्नईतला हा रिक्षाचालक हायटेक बनला.
सॅमसनच्या संकेतस्थळाला दररोज किमान सोळा ते अठरा हजार लोक भेट देतात, अनेकजण आँनलाईनच आपली नोंदणी सॅमसंगकडे करतात. चेन्नईतल्या विविध स्थळांची माहीती घेतात, एवढेचं नव्हे तर त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, तसंच एसएमएस पाठवून रिक्षा बोलावून घेतात, चेन्नईत येणारे परदेशी पाहुणे त्यांचे चांगले मित्र बनलेय, तो अशा परदेशा पाहुण्यांना आपल्या रिक्षातून संपूर्ण चेन्नई दर्शन घडवतो, त्यांच्या सेवेवर परदेशी पाहुणेही खुश असतात अत्याधुनिकतेशी नाळ जोडलेल्या सॅमसनची परदेशी पाहुण्यांना रिक्षाची सेवा उपलब्ध करून देतांना दमछाक होते सॅमसंगनं एवढ्यावरच न थांबता विविध भाषा शिकून घेतल्या. अर्थात या भाषांचा त्याचा व्यवसाय वाढीसाठी फायदा होतोय. अतिथी देवो भव...हे तत्व स्विकारून परदेशी पाहुण्यांना सेवा पुरवणाऱ्या सॅमसंगचा आदर्श इतर चालकांनी घ्यायला हवा

Wednesday, January 6, 2010

चिमुरड्यांचे असेही धाडस...

रत्नागिरीतली एक मोठी बहिण आपल्या लहानग्या बहिणीच्या आणि शिक्षणच्या प्रेमाखातरं तिला शिक्षणात मदत करतेय. लहानग्या बहिणीसाठी स्वतः होडी वल्हवुन खाडी पार करून ती तिला शाळेत पोहचवते. पाहूयात हा चिमकुलीच्या धाडसी शिक्षणाचा प्रवास....
कोकण....समुद्र आणि डोंगरदरीत वसलेला प्रदेश...असं हे कोकण दळणवळण आणि प्रवासासाठी अद्यापही दुर्लक्षित राहिलंय. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागतायं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्‍वर तालुक्‍यात बावनदीच्या आसपास काही गाव वसलीयत.यातल्या परचुरी गावात चौथीपर्यत सोय आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोळंबे,संगमेश्‍वर गावात जावे. या गावाकडं जाण्यास दुरचा प्रवास करावा लागतो. पुल नसल्यानं त्यासाठी वेळही खूप जातो,मात्र त्यावर मात करतं या गावचं विद्यार्थी होडीतून दररोज ये-जा करतात. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांत लिंगायत भगिनींचा समावेश आहे.;त्यातली एक मोठी बहीण अंकिता ही लहान बहीण अनुष्कासाठी चक्क होडी वलवून शाळेसाठी सोडते.शाळा सुटताना ही अंकिता आपल्या संवगड्यांनाही घरी होडीतून आणते.
परचुरी गाव.... हे जवळपास दोन हजार लोकवस्तीचं. या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यानं नागरीकांना विविध प्रश्नांना तोंड द्याव लागतंय. दररोजचा होडीतून प्रवासही त्यांच्यासाठी जिकरीचा ठरत आहे.
शिक्षणाबाबत सरकारचे धोरण,भूमिका काय हे आपणास माहित आहे. मात्र कोकणातल्या या भगिनींचे शिक्षणाविषयी प्रेम काही वेगळंच आहे. गावाजवळ पुढारी आणि अधिकाऱ्यांना पुल बांधायला अद्याप मुहूर्त सापडला नाहीय. मात्र त्याकडं दुर्लक्ष करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या लिंगायत भगिनींनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातलंय असं म्हणता येईल..

Tuesday, November 17, 2009

विक्रमांचा बादशहा

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटप्रेमींचा देव... क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटानं विश्वविक्रमांचे डोंगर रचलेत. त्यानं तमाम क्रिकेटरसिकांना नेहमीच आपल्या सहजसुंदर फलंदाजीनं मंत्रमुग्ध केलंय. त्यामुळेच लाडका सचिन क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातल्या ताईत बनलाय.
सचिन रमेश तेंडुलकर....मूळचा मुंबईकर...जन्म २४ एप्रिल १९७३...वय३६वर्षे...उंची ५फूट ५ इंच...काहीसं एवढंच वर्णन ऐकलं की,समोर मुर्ती उभी राहते सचिन तेंडुलकरची. मुर्ती लहान पण किर्ती महान...हे शब्द तेंडुलकरच्या बाबतीत खरोखरच तंतोतंत खरे ठरतात किंबहुना त्यानेच ते खरे करून दाखवलेत. सचिननं वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याला १५नोव्हेंबर १९८९ला कराचीत भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात संधी मिळाली. या सामन्यातला सहभाग त्याला परमोच्च आनंद देणारा ठरला. सामन्यात त्याला टेस्ट कॅप मिळाली आणि सचिन भारतीय संघाचा अधिकृत फलंदाज झाला. पण या सामन्यात त्याला फलंदाजीस वाव मिळाला नाही.

६ मार्च १९९०ला वेलिंग्टन इथल्या न्युझीलंडविरूध्दच्या सामन्यात एक धाव नोंदवत त्यानं आपल्या धावांची सुरवात केली. खेळण्यास सुरवात केल्यानंतर बरोबर २वर्षानंतर१९९२ला त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर त्यानं पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या धावांच्या सरासरीकडे लक्ष दिल्यास प्रत्येक वर्षी साधारणतः एक हजार धावा जमा करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवलेले दिसते.एवढेच नव्हे तर हे उद्दीष्ट साध्य करायचंच या ध्येयानं तो आपली खेळी करतांना दिसतो.

कसोटी कि एकदिवसीय सामना अर्धशतक,शतक झळकवत त्यानं आपली घौडदौड सुरुच ठेवली. पाकिस्तान,न्युझीलंड,आँस्ट्रेलिया,इंग्लड..अशा सर्वच प्रतिस्पर्ध्याविरूध्द त्यानं कौतुकास्पद कामगिरी केली. केवळ आपल्या धावा वाढवण्याकडं अथवा फक्त कारकीर्दीकडं सचिननं कधीही लक्ष दिले नाही.संघ अडचणीत असतांना एक खांबी तंबूसारखा मैदानावर थांबणारा सचिन टीम इंडियाला नेहमीच आधार वाटलायं. किंबहुनां त्यांच्या सर्वीत्तम खेळीनंच भारतीयाला अनेकदा विजय मिळवून देत हे सिध्दही केलंय. दहा,पंधरा हजारांनंतर ५ नोव्हेंबर२००९ ला त्यानं पुर्ण केलेल्या १७हजार धावा हे त्यांच्या खेळाचं वेगळेपण म्हणता येईल.

सचिन आता थकलाय,त्यानं निवृत्त व्हावं या सल्लाला सचिननं एकदिवसीय सामना,कसोटी असो की टवेंटी-२० अशा सर्वच सामन्यात सर्वीत्तम खेळ करत चोख प्रत्युत्तर दिलंय. सचिन आपल्या मित्रपरिवारात तेंडल्या,लिटल चॅम्यियन्स या टोपन नावानं ओळखला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी आहार त्याला घ्यायला आवडतो. मराठीबरोबरच इंग्रजी,हिंदी भाषा त्याला येतात. साहस,रहस्यमय कथा वाचण्यांबरोबरच चित्रपट पहायला त्यांला आवडते. जुनी गाजलेली हिंदी,मराठी गाणी ऐकणे हा त्यांचा छंद आहे. याशिवाय स्कुबा डायव्हींगसह साहसी खेळात सहभागी व्हायला त्याला नेहमी आवडते.

अनेकदा भारतीय संघातल्या सहकाऱ्यांबरोबर हे खेळ खे्ळायला तो प्राधान्य देतो. विश्व विक्रमांचे डोंगर रचणाऱ्या सचिननं गर्व,अहंकाराला आपल्यापासनं दूरच ठेवलंय. आक्रमकतेपेक्षा संयमाला प्राधान्य द्यायला त्याला आवडते. क्रिकेटरसिकांना त्यांच्या खेळातून हा प्रत्यय नेहमीच आलायं. सचिन कुंटुबवत्सलही आहे. क्रिकेटचा दौरा नसेल त्यावेळेस आपला जास्तीत जास्त वेळ तो कुटुंबास देतो. आपल्या कारकीर्दीचा २० वर्षाचा टप्पा त्यानं गाठलायं. सचिननं कायमच खेळत राहावे,विक्रमाचे असेच डोंगर रचावेत अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

Sunday, October 11, 2009

राज,उध्दवची कम्युनिटी वाढतेय
शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे निगर्वी,सालसं आणि ध्येय निश्‍चीत करून शांतपणे मार्गक्रमण करणारा नेता... तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोख ठोक भूमिका मांडणारा,काहीसा संतापी परंतु आपल्याला हवी असलेली कृती करूनच घेणारे,ती करण्यासाठी भाग पाडणारे,ध्येयवादी व्यक्तीमत्व म्हणून परिचित......ही दोन्ही व्यक्तीमत्व चालणं,बोलणं,वागण्यापासून सर्वच बाबतीत भिन्न. त्यांच्याप्रमाणंच त्यांचे चाहतेही अर्थात "फॅन्स'भिन्न असणं स्वभाविक आहे. राज आणि उध्दवच्या चाहत्यांची स्वतंत्र कम्युनिटी असून या कम्युनिटीवरील सदस्यां(मेंबर)च्या संख्येत वाढ होत आहे.
गेल्या दिड-दोन महिन्यांत आपण विविध संकेतस्थळाच्या कम्युनिटीवर नजर टाकल्यास निवडणूकींमुळे सदस्य संख्येचा आलेख वाढता वाढता वाढे...असाच राहिला आहे हे लक्षात येईल.राज्यातले कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडून कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर भगवा फडकवायचाच. हे ध्येय शिवसेना-भाजपा युतीने समोर ठेवला आहे. त्याचदृष्टीने प्रचाराची रणनिती निश्‍चीत करत युतीचा राज्यभर प्रचार सुरु आहे.
दुसरीकडे नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभा निवडणूकीत नवे असूनही चांगले यश मिळवले. त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेत घवघवीत यश पक्षाला मिळेल. किंबहुना कोणत्याही पक्षाला मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्‍य नाही,ंअसा विश्‍वास मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आहे. प्रचारासाठी केवळ तिनच दिवस शिल्लक राहिल्याने जास्तीत जास्त भागात प्रचारासाठी जाण्यावर युती आणि मनसे नेत्याचा भर आहे. मतदानाच्या दिवशीचे मतदान आणि मतमोजणीनंतरचा कौल हे अद्याप दूर आहे. असे असलेतरी राज आणि उध्दवचे फॅन त्यांना मोबाईलवरून संपर्क साधणे शक्‍य नसल्याने स्क्रॅंप,चॅटींगद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. राज आणि उध्दव यांना आपल्या फॅनसला उत्तर देणं हे सध्याच्या निवडणूका रणधुमाळीत आजमितीस शक्‍य नाही. पण आपल्या फॅनचा हिरमोड होऊ नये. तसेच आपण त्यांच्या संपर्कात आहोत. हे दाखवण्यासाठी शिवसेना,मनसेने स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चाहत्यांच्या प्रश्‍नांना उत्तर दिले जाते. त्यांच्या सूचना,शुभेच्छा,प्रस्ताव स्विकारले जात आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फक्त आँकुर्टवरील कम्युनिटीचा विचार केला तर ही कम्युनिटी बरीच जुनी आहे. राज ठाकरे एमएनएस(18हजार234 सदस्य),राज ठाकरे मराठी हदयसम्राट(26,512)राज आँकुर्ट सेना(12,438),राज ठाकरे एक वादळ(11हजार908) याशिवाय फक्त राज ठाकरे नावाचे स्वतंत्र पाच फॅन्स क्‍लब असून त्यांच्या सदस्यांची संख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. "मुंबई आहे मराठी माणसाची, नाही कोणाच्या बापाची....ज्यांनी लावली महाराष्ट्राची वाट, ते काय आणणार नवीन पहाट,सत्तेसाठी सातशे साठ,महाराष्ट्रासाठी एकच मराठी हदयसम्राट राज ठाकरे...यासारखे संदेश कम्युनिटीवर फॅन्स क्‍लबने दिलेले आहेत. मनसेची "डब्लू डब्लू मनसे ओराजी" ही स्वतंत्र वेबाईट आहेत त्याचे1हजार454 सदस्य आहेत."महाराष्ट्राचा सन्मान राखा,आम्ही तुमचा मान ठेवू,अन्यथा तुम्ही जाता तुमच्या गावा आमचा राम राम घ्यावा...आपला मुंबईकर असा संदेश दिलेला दिसतो. मनसे विद्यार्थी सेनेचे1हजार272 सदस्य आहेत. "जगाला हेवा वाटेल,असा महाराष्ट्र घडवूया' हे राज ठाकरेंचे आवाहन युवकांसाठी ठळकपणे दिले आहे. याच आवाहनाला युवकांनी प्रतिसाद देत मनविसेच्या झेंड्याखाली अनेक युवक एकत्र झाल्याचे त्यांच्या फॅन्स क्‍लबच्या वाढत्या संख्येहुन लक्षात येत आहे.राज ठाकरेंप्रमाणेच शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरेंही आपल्या फॅन्सच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या दैनंदिन नियोजनावरून दिसते. आँकुर्टवर उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे मोठे सहा ग्रुप आहेत. या ग्रुपच्या सदस्यांची संख्या सात ते आठ हजारांच्या दरम्यान आहेत. यातलाच सातवा फॅन्सचा ग्रुप हा बाळासाहेबांबरोबर असलेल्या राज उध्दव यांना माननारा आहे. या ग्रुपचे सदस्य कमी असलेतरी त्यांचे संदेश लक्ष वेधतात. उध्दव ठाकरे फॅन्स क्‍लबचे संदेशही वेगळेपण जपणारे आहे. एका चाहत्यांने युतीच्या नव्या सरकारची अपेक्षा व्यक्त केलीय. तो म्हणतो"येणार या महाराष्ट्रात आता शिवशाही येणार,आता ज्यांची वेळ भरली, त्यानेच आडवे यावे,उध्दव ठाकरे...आपल्या काका-मामाची मिमिक्री करून मोठा झालेला हा नेता नव्हे, या नेत्याकडे स्वतःची ओळख आहे,ताकद आहे... असं वर्णन आहे. काहीं चाहत्यांना उध्दव हे चांगले राजकारणी आणि महाराष्ट्राला दिशा देणारे नेते वाटतात.काहींनी राजकारण हा त्यांचा पिंड नाही, ते लाजाळू आणि शांतपणे एकांतात रमणारे कलाकार आहे, त्यांची आपली फोटोग्राफी कला जोपासावी असे वाटते तर काहींना बाळासाहेबानंतरचा चांगला नेता म्हणून तेच योग्य असल्याचं वाटते.राज आणि उध्दवच्या या कम्युनिटवर चाहत्यांनी आपआपल्यापध्दतीने संदेश नोंदवत आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत. या दोन्ही नेत्यांना हे संदेश भविष्यातल्या राजकारणाला भरारी,प्रोत्साहन देणारेच ठरतील यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी आपली कम्युनिटी अपडेट ठेवण्याबरोबरच वेबसाईटही अपडेट ठेवण्यावर भर दिला आहे. या दोन्ही नेत्यांच्या फेसबुक,हाय फाय,व्हॅंनसारख्या कम्युनिटीवरही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन सभा,वार्ताकंनाच्या बातम्या,ठळक नोंदणी, मान्यवरांचे संदेश,छायाचित्र,व्हीडीओशुटींग सर्व काही उपलब्ध करून दिलेले दिसते. त्यासाठी आयटी क्षेत्रातला स्वतंत्र ग्रुपच तिथे काम करतो आहे. हे नमूद करावेसे वाटते.--- वुई हेट राज ठाकरे
....महाराष्ट्र नवनिर्माणचे स्वप्न पाहणाऱ्या किंबहुना त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंना पाठींबा देणारा स्वतंत्र वर्ग जगभर आहे. तसा त्यांचे विचार न पटणारा,त्यांचा विचारांना विरोध करणारा वर्गही असल्याचं जाणवते. त्यांना विरोध दर्शवणाऱ्या आँकुर्टवर वुई हेट राज ठाकरे(1हजार539सदस्य),आय हेट राज ठाकरे(1हजार156)आँल हिंदुस्थान हेट राज ठाकरे(831सदस्य) या कम्युनिटी आहेत. त्यांच्यावर आपआपल्यापध्दतीने संदेश देण्यात आले आहे."वुई सपोर्ट राज ठाकरे या कम्युनिटीवरील1हजार 219 सदस्यांनी राज ठाकरेंच्या बाजूने आहेत. त्यांच्या विचाराने हे सदस्य प्रेरीत झालेले दिसतात

कुणी आपला... कुणी परका...एकाच माळीचे मळी

आपला....कुणी परका....सगळे एकाच माळीचे मणी...
देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली. पण देश,राज्यातले गरीबी निर्मुलन, महागाई,भ्रष्टाचार,बेकारी यासारखे अनेक प्रश्‍न जैसे थे आहे.उलट दिवसागणिक या प्रश्‍नांची संख्या वाढत आहे. भूकेल्यांसाठी अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा आहेत. या गरजा सोडवण्यासाठी केंद्र-राज्यांच्या योजना अनेक आहे. त्याचे नियोजन नसल्याने यशस्वी अमंलबजावणी होत नाही. त्यात अनेक पळवाटा आहेत त्यामुळे त्या केवळ कागदोपत्रीच राहतांना दिसतात....सरकारची टर्म संपते...पाच वर्षानी निवडणूका येतात....पुन्हा तेच पक्ष,तेच नेते...बेकारी,भ्रष्टाचार,गरीबी दुर करण्याची तीच पोकळ अश्‍वासने...सोडवण्याचे काही नियोजन नाही.....सारं काही तेच तेच मग मतदान करायचे कशासाठी असा प्रश्‍न नागरीकांना पडला तर त्यात नवल नाही.... होय हे खरं आहे पक्ष,नेत्यांबद्दल असलेला संताप त्यांच्या संवादातून जाणवतो...केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातल्या विविध जिल्ह्यात आलेले चाकरमानी मतदानासाठी आपल्या गावी न जाण्याचा प्रश्‍न यंदाही ऐरणीवर आहे.राज्य घटनेने प्रत्येक नागरीकांला मतदानाचा हक्क दिला आहे. या आपल्याला मिळालेल्या हक्कांचा योग्य वापर करून पात्र उमेदवार निवडून देणे आवश्‍यक आहे. नागरीकांनी मतदान करावे.यासाठी निवडणूक आयोगापासून विविध सामाजिक संस्था,मंडळे,वृत्तपत्र समुह जाहीरातीच्या माध्यमातून आवाहन करतात. या आवाहनालाप्रतिसाद देत अनेक नागरीक मतदानासाठी बाहेर पडतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात. पण समाजात असाही एक वर्ग आहे की,ज्याला राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार,घोषणा याबद्दल काही देणे घेणे नाही. हा वर्ग आपल्या व्यवसाय,कामातच अधिक लक्ष देतो. यात अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित नागरीकांचाही तितकाच सहभाग असतो असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. त्यामुळं स्वभाविकच मतदान कमी प्रमाणात होते. गेल्या काही वर्षातल्या लोकसभा विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली तर हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला मिळालेला हा मुलभूत हक्क नागरीक का नाकारतात...याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोलण्यातून हे जाणवते. मुंबईत पनवेल भागात उपहारगृह चालवणारे किसन तेलुरे,सुलोचना तेलुरे हे दाम्पत्य मुळचे बिड जिल्ह्यातले. गेल्या बारा वर्षापासून ते मुंबईत आहे. पण एकदाही मतदान करण्यासाठी आपल्या गावी गेले नाही अथवा मुंबईतही मतदान केले नाही. गावाकडे असतांना केव्हातरी मतदान करायचे पण आता टाळतात. पक्ष,नेत्यांबद्दल त्यांच्या मनात चिड आहे. निवडून कुठलाही पक्ष येवो, काही फरक पडत नाही, महागाई,बेकारी वाढते आहे. सर्व सारखेच आहे असं त्यांना वाटते. कळंबोली कॉलनीतला गफूर सैय्यद बुलढाण्याचे आहे. भंगारव्यवसाय सुरु करून त्यांनी आपला जम बसवला आहे. सैय्यद परिवाराला निवडणूक,राजकारण हे विषय आवडत नाही. आपले प्रश्‍न आपल्यालाच सोडवावे लागणार आहे त्यासाठी नेते,पक्ष थोडेच येणार आहे, त्यामुळे मतदान वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. निवडणूकीपुरते पक्षाचे नेते येतात,अश्‍वासन देऊन निघून जातात आणि नंतर कधी फिरकत नाही. त्यामुळं मतदान नकोच असे गफूरभाई सांगतात. याच भागातले हातगाडीवर व्यवसाय करणारे राजाराम जाधव हे मूळचे धुळ्याचे. त्यांनाही राजकारणबद्दल प्रचंड चिड आहे. पक्ष,नेते म्हणजे ढोंगीपणा आहे.ढोंग करून सत्ता,पैसा मिळवायचा आणि त्यांचा उपयोग आपल्या परिवारासाठी करायचा असे त्यांचे म्हणणे आहे. आपला व्यवसाय बंद ठेवून मतदान करण्यासाठी गावाकडे जाणे त्यांना पसंत नाही. नावडे भागातल्या एका पतसंस्थेत काम करणाऱ्या ललित शुक्‍ल या सुशिक्षित युवकांच्या भावना तीव्र आहे. स्वातंत्र्याला साठ वर्ष पुर्ण झाली. पण देश,राज्यातले मुलभूत प्रश्‍न काही सुटले नाही, उलट बेकारी,महागाई,भ्रष्टाचार वाढला. या सर्व बाबींना पक्ष,नेतेच जबाबदार आहे. त्यामुळे भारताचा पुरेसा विकास झालेला नाही असं त्याला वाटते. सध्या राजकारणात नेतेमंडळीच्या परिवारतल्या प्रवेशाबाबत त्यांना नापसंती व्यक्त केली. या काही प्रातिनिक प्रतिक्रीया आहेत. पण समाजात असे अनेक घटक आहे. त्यांना राज्यकर्ते,नेते,पक्ष त्याचे विचारांबद्दल अनास्था आहेत. यात विशेषतः सामान्य नागरीकांबरोबरच बाहेरगावाहुन आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मतदान करण्याबद्दल जनजागृतीचे प्रयत्न अधिक व्हायला हवेत. मतदानापासून दुर राहणारा हा वर्ग मतदानाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी सरकारदरबारी अधिक प्रयत्न व्हावेत असाही सूर व्यक्त होऊ लागलायं. नागरीकांत नेते,पक्षाबद्दल अनास्थेची भावना निर्माण होणे हे चूकच आहे. त्यासाठी नेते,पक्षांनी आत्मपरिक्षण करण्याची आज गरज आहे असे वाटते.

Thursday, June 25, 2009

रबडी महात्म्य ढोली आणि ठेपला

वेळ पहाटे चार साडेचारची...ठिकाण अबू रोड अर्थात माऊंट अबू रेल्वेस्टेशन...रणकपूर एक्सप्रेस स्थानकावर थांबते आणि बाहेर एकच गोंधळ सुरु होतो...साहब ले लो अबू की फेमस रबडी...एक बार लेंगे तो बार बार मागोंगे..मुक्त मै घर ले जायेंगे...पसंद आयी तो दोन बार आयेंगे..अच्छी नही लगी तो दाम ले जावोंगे...यासारख्या विक्रेत्यांच्या घोषणांनी प्लॅटफार्म गजबजून जातो....कुल्लाहात असलेली रबडी...प्रत्येक बोगी आणि खिडकीजवळ जाऊन विक्रीचा त्यांचा सपाटा सुरु होतो...प्रवाशांना पटवून रबडीचा कुल्लाह त्यांच्या हातात देत पैसे घेतल्यानंतरच विक्रेत्याचं समाधान होते...एवढ्या पहाटेही विक्रीचा हा अनोखा फंडा लक्षात घ्यावा असाच वाटला...इंटरनॅशनल मिडीया कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्या राहणीमानाबरोबरच अस्सल खवैय्यगिरी जपणारेही अनेकजण पहायला मिळाले.
बारा पंधरा तासांच्या प्रवासानंतर अबू स्टेशनवर पहाटे उतरलेल्या कुठल्याही प्रवाशाला आपला थकवा दूर करण्यासाठी चहा प्यावासा वाटेल. त्यातही महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल तर ती रबडीपेक्षा चहालाच अधिक प्राधान्य देईल. त्याप्रमाणे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. पण पहाटेची वेळ असूनही संपुर्ण स्टेशनवर आम्हाला कुठेच चहा मिळाली नाही. विक्रेत्यांकडे चहाबद्दल विचारणा केली तर ते तिरस्काराच्या भावनेनंच आमच्याकडे बघत.
काही विक्रेत्यांनी तर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत इतर ग्राहकांना रबडी देणं पसंत केल. स्टेशनवर सर्वत्र रबडी विकली जात होती. आमच्यापैकी काहींनी चाय नही तो रबडी सही...असं म्हणतं रबडी खायचं ठरवलं तर काहींनी रबडी आणि एवढ्या पहाटे असं म्हणतं खाण्यास नकार दिला. दहा रूपये देत रबडी घेत काहींनी स्वाद चाखायला सुरुवात केली. त्यांनी रबडी घेतल्यानंतरही विक्रेता समोर जाण्यास तयार नव्हता. तो आपल्या खास शैलीत रबडी महात्म्य सांगत इतरांना आग्रह करत होता. अखेर आम्हांलाही त्यानं रबडी घेण्यास भाग पाडले...आणि आम्ही पहाटेच्या वेळी चाखलेली रबडीची चव खरोखरच लक्षात रहावी अशीच होती...याबद्दल विक्रेता आणि सुरवातीस रबडी खाणाऱ्यां मित्रांचे आभार मानावे तेवढे थोडेच..त्यांचे चाय नही तो रबडी सही... हे वाक्यही माझ्या लक्षात राहिले.
पाच दिवसीय परिषद आटोपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा प्रजापिता ईश्वरिय विश्वविद्यालयातर्फे आम्हाला मका चिवडा,शंकरपाळे पाकिट आणि काजू बर्फी ही ईश्वरीयभेट म्हणून देण्यात आली. या भेटीलाच ढोली अर्थात एकत्रित प्रसाद म्हणतात हे आम्हाला पाहिल्यांदा समजलं. सहभागी प्रतिनिधींना प्रवासात सहभोजनासाठी पुरी,खाकरा,बटाटा चिप्स आणि त्याजोडीला लोणच्याचे विविध प्रकार असलेले पाकिट देण्यात आले. या खानासुमारीला ठेपला असं म्हणतात. रबडीवगळता ढोली,ठेपला ही वाक्ये आमच्यासाठी नवीनच होती...या सर्व नव्या खाद्यपदार्थाचा परतीच्या प्रवासात आम्ही आस्वाद घेतला..या पदार्थाची चव ओठावर ठेवतच आम्ही घरी परतलो पण राज्य बदलल्यानंतर जात,धर्म,पंथ आणि खानपानही बदलते आणि ते कसं असू शकत याचा प्रत्यय आम्हाला राजस्थान जयपूर दौऱ्यादरम्यान आला...