Wednesday, September 28, 2011

अनावश्यक कॉल्सची डोकेदुखी संपली...पण दर वाढणार


(मोबाईलसंदर्भात प्रत्येकाने वाचावा असा माहितीपूर्ण वाचनिय लेख....)
देशातील 90 कोटी मोबाईलधारकांची अनावश्यक 'कॉल्स' आणि 'एसएमएस'ची डोकेदुखी बंद झाली आहे. केव्हाही येणार कॉल्स आणि एसएमएस यावर ट्रायने कडक
उपाययोजना केल्या आहेत. टेरिफ रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (टीआरएआय) 27 सप्टेंबरपासून कोणत्याही 'सिम'वरुन एका दिवसाला 100 एसएमएस पाठविण्‍यावर प्रतिबंध घातले आहे. दिपावली, ईद आणि यासारख्या इतर मोठ्या सणांना मात्र मोबाईलधारकानांना सूट दिली जाणार आहे. सणासुदीला 100 पेक्षा जास्त एसएमएस पाठवू शकता येतील. बिनकामाचे कॉल्स आणि एसएमएसपासून तमाम मोबाईलधारकांचा सुटका करण्याचा विचार करताना ट्रायला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सपासून मोबाईलधारकांची सुटका करण्यासाठी सर्व मोबाईल यूजर्सवर हे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही भविष्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे मत ट्रायशी संबंधित अधिकार्‍यांनी व्यक्त केले.
ट्रायने पाच सप्टेंबरला अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सवर प्रतिबंध घालण्यासाठी शिफारस केली होती. मात्र, त्यावेळी 'सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' ('सीओएआय')ने ट्रायकडे आपल्या अहवालावर फेरविचार करण्याची विनंती केली.
मोबाईलधारकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा:
'ट्राय'द्वारा अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सवर लावण्यात आलेले प्रतिबंध म्हणजे मोबाईलधारकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने ('सीओएआय') म्हटले आहे. सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस. मॅथ्यूज यांच्यामते ट्रायद्वारा निश्चित करण्यात आलेली 100 एसएमएसची मर्यादा ही देखील मोबाईलधारकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. अनेक मोबाईलधारकांच्या मते 100 एसएमएसची ‍मर्यादा फारच कमी आहे.
'एसएमएस' संवादाचे सोपे माध्यम:
संवाद साधण्यासाठी 'एसएमएस' हे अत्यंत सोपे माध्यम आहे. मोबाईलधारक एखाद्या वेळेस एसएमएस पाठवून संकटातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो. जर त्याचा 100 एसएमएसचा कोटा संपल्यानंतर मात्र त्याच्याजवळ कोणताही पर्याय राहत नाही. यावरुन मोबाईलधारकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. असे सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस. मॅथ्यूज यांनी ट्रायला गेल्या आठवड्यात लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
'डू नॉट कॉल' रजिस्टरमध्ये नोंद करा आणि चिंतामुक्त व्हा:
'डु नॉट कॉल' रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या मोबाईलधारकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. डू नॉट कॉल रजिस्टरमध्ये नोंदणी केलेल्या मोबाईलधारकांना जाहिरातींचे एसएमएस अथवा कॉल्सची चिंता करण्‍याचे कारण नाही. ट्रायने केलेल्या शिफारशीमध्ये मोबाईलधारकांना 'डू नॉट कॉल रजिस्टरमध्ये नोंद करण्याची आवाहन केले आहे.
नोंदणी केलेल्या ग्राहकांना जर असे जाहिरातींचे कॉल्स आलेच तर याबाबत त्याच्या टेलिफोन ऑपरेटरला तक्रार केल्यास त्या टेलिमार्केटिंग कंपनीला मोठा दंड भरावा लागेल.
पोस्टपेड कनेक्शनसाठी एका महिन्याला तीन हजार एसएमएस:
ट्रायने दिलेल्या शिफारसीमध्ये म्हटल्याप्रमाणे पोस्टपेड कनेक्शन असणार्‍या मोबाईलधारकांना एका महिन्यात केवळ 3,000 एसएमएस पाठविण्याची मुभा असावी. त्यापेक्षा जास्त एसएमएस पाठविण्याची त्यांना टेलिफोन ऑपरेटर्सने परवानगी देऊ नये.
दोन पर्याय:
अनावश्यक कॉल्स आणि एसएमएसच्या डोकेदुखीपासून मोबाईलधारकांची सुटका करण्यासाठी ट्रायने दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
पहिला पर्याय:
मोबाईलधारक 'फुली ब्लॉक्ड कॅटेगरी'ची निवड करू शकतो. हा पर्याय 'डू नॉट कॉल' रजिस्टर सारखाच आहे. 'फुली ब्लॉक्ड कॅटेगरी'ची निवड केल्यानंतर आपल्याला कोणताही व्यावसायिक कॉल्स अथवा एसएमएस येणार नाही. मोबाईलधारकांना नोंदणी करण्‍यासाठी इंग्रजीत कॅपिटल अक्षरात 'स्टार्ट' हा शब्द लिहून त्यानंतर एक स्पेस देत शून्य (0) हा अंक लिहावा. त्यानंतर हा एसएमएस 1909 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
दूसरा पर्याय:
मोबाईलधारक पार्शियली ब्लॉक्डची निवड करू शकतो. हा पर्याय निवडल्यानंतर त्याला काही निवडक व्यावसायिकांचेच एसएमएस येतील. यासाठी त्या ग्राहकाला आपल्या आवडीनुसार कंपन्यांची निवड करावी लागेल.
ट्रायने केली विभागणी:
पार्शियली ब्लॉक्ड पर्यायानुसार ट्रायने आठ भागात विभागणी केली आहे. बॅंकींग, विमा, क्रेडीट कार्ड, रियल एस्टेट, शिक्षण, आरोग्य, ग्राहक उपयोगी वस्तू व ऑटोमोबाईल, संचार, प्रसारण, मनोरंजन, पर्यटन आणि आयटी असे विभाग मोबाईलधारकांसाठी उपलब्ध असतील. संबंधीच्या सेवा पुरवणार्‍या टेलिमार्केटिंग कंपन्या त्यांच्या जाहिरातीचे एसएमएस अथवा कॉल्स करू शकतील.
...टेलिकॉम कंपन्यांचे धाबे बसणार परिणामी एसएमएसचे दर वाढतील?
ट्रायने मंगळवारी (27 सप्टेंबर) लागू केलेले प्रतिबंध टेलीकॉम कंपन्याच्या फायद्याचे नाही. कंपन्यांच्या मते यामुळे एसएमएस पाठवणार्‍या मोबाईलधारकांवर परिणाम होऊन त्यांची संख्या रोडावणार आहे. परिणाम तोटा भरून काढण्यासाठी टेलीकॉम कंपन्या एसएमएसच्या दरात वाढ करण्‍याची शक्यता आहे......(सौजन्य-दिव्य मराठी)