Wednesday, March 4, 2009

हल्ला श्रीलंकेवर नव्हे क्रिकेटजगतावर


लाहोरमधील गदाफी स्टेडियमनजीक दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंवर हल्ला केला. खेळाडूंच्या बसला बारा दहशतवाद्यांनी चारही बाजूंनी घेरले आणि बेछूट गोळीबार केला... रॉकेट डागले...हातबॉम्बही फेकला...क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदवला जात आहे....दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला म्हणजे एकट्या श्रीलंका संघावर नव्हे तर संपुर्ण क्रिकेटविश्वावर झाल्याचं बोललं जात आहे...

मुंबईवर झालेल्या २३ नोव्हेंबरच्या हल्ल्यांशी साधर्म्य सांगणारी ही घटना विविधांगांनी उलगडून पाहता येईल. खरं तर भारतीय संघच पाकिस्तान दौ-यावर जाणार होता...पण मुंबईवरील हल्ल्यांची घटना ताजी असतांना किंबहुना या हल्ल्याचा पाकिस्तानात कट शिजला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसं अनेक पुरावेही केंद्र सरकारनं पाकिस्तानला दिलेले आहे. पाकिस्तानंनही हे अतिरेकी आपल्याच देशातून भारतात आल्याचं कबुल केलंय. उशिरा का होईना त्यांना शहाणपण सूचलेले आहे.

या दौ-यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं नकार दिल्यानं हा दौरा वाया जाऊ नये म्हणून पाकिस्ताननं श्रीलंका संघास प्राचारण केलं. खरं तर या दौ-यावर जाण्यास अनेक श्रीलंकनं खेळाडूंची इच्छा नव्हती पण तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अर्जुन रणतुंगा यांच्या आग्रहावरून श्रीलंकेका संघाला पाकिस्तान दौ-यावर जाणं भाग पाडलं. एकतर्फी निर्णयामुळं त्यांची नंतर हकालपट्टी झाली हा भाग वेगळा. पण पाकिस्तानातील असुरक्षित वातावरण तेथील अस्थिरता ही सर्वांना माहीती आहे. किंबहुना त्या देशात दिवसागणिक दहशतवाद्यांकडून हल्ल्या करण्याच्या,लोकांना ठार मारण्याच्या घटना घडत आहे. असं असुरक्षेचे वातावरण असतांनाही श्रीलंका संघ या दौ-यावर का आला हे न सुटणारेच कोडे आहे.

या खेळाडूंची निवासव्यवस्था आणि परिसरातल्या सुरक्षेबाबत नेहमीप्रमामे पाकिस्तान क्रिकेट मंडळ,संयोजक गाफील राहीले.....आणि शेवटी टार्गेट असलेल्या श्रीलंका संघावर हल्ला झाला. हल्ल्यात खेळाडूंचा जीव वाचला हे जरी खरे असलेतरी त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झालेला आहे. त्यांच्या जखमा भरून येऊ शकतात पण मनावर झालेला आघात कसा भरून निघणार हा खरा प्रश्न आहे...अडचणीत असलेल्यांना मदत करायला जावे आणि मदतीचे हे फळ मिळावे...अशीच काहीशी अवस्था श्रीलंका संघाची झाली होती.

पुढील काळात श्रीलंका संघ कुठल्याही दौ-यात आत्मविश्वासानं खेळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पाकिस्तान दौ-यावर जाण्यास आता कुठला संघ सहजपणे तयार होणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक दौ-याबाबत नेहमी प्रश्नचिन्हच राहील हे नक्की. या घटनेमुळं आगामी आयपीएल तसंच २०११ मद्ये उपसंखडात होणा-या विश्वकरंडक स्पर्धेसमोरही सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुरक्षेचे नियोजन असेल तरच मानांकित खेळाडू यात सहभागी होऊ शकतात.

या घटनेमुळे अगोदरच अंतर्गत वाद आणि अस्वस्थेनं पोखरलेल्या पाकिस्तान संघाबद्दल चिड,घ्रृणा सर्वांच्याच मनात निर्माण होणं स्वभाविकच आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेट नकाशातून पाकला गायब करण्याचं नियोजनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीवर सुरु असल्याचं बोललं जात आहे.

पुढील काळात श्रीलंका संघ कुठल्याही दौ-यात आत्मविश्वासानं खेळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पाकिस्तान दौ-यावर जाण्यास आता कुठला संघ सहजपणे तयार होणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक दौ-याबाबत नेहमी प्रश्नचिन्हच राहील हे नक्की. या घटनेमुळं आगामी आयपीएल तसंच २०११ मद्ये उपसंखडात होणा-या विश्वकरंडक स्पर्धेसमोरही सुरक्षेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुरक्षेचे नियोजन असेल तरच मानांकित खेळाडू यात सहभागी होऊ शकतात. या घटनेमुळे अगोदरच अंतर्गत वाद आणि अस्वस्थेनं पोखरलेल्या पाकिस्तान संघाबद्दल चिड,घ्रृणा सर्वांच्याच मनात निर्माण होणं स्वभाविकच आहे. एवढंच नव्हे तर क्रिकेट नकाशातून पाकला गायब करण्याचं नियोजनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीवर सुरु असल्याचं बोललं जात आहे.

Monday, March 2, 2009

सलाम निसर्गकवीला


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे....अशी भव्य कल्पना घेऊन मानवी कल्याणासाठी प्रार्थना करणारे,निसर्गाबरोबरच माणसाशी तादात्म्य पावलेले निसर्गकवी नामदेव धोंडो तथा ना.धो.महानोर.यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं मानाचा जनस्थान पुरस्कार देऊन नुकतच सन्मानित केलं. त्याबद्दल प्रथम निसर्गकवीला सलाम

नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे एक सांस्कृतिक अधिष्ठानचं. या प्रतिष्ठानची धुरा याच क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींच्या हातात असल्यानं तात्यानंतरही खरोखरच यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. आतापर्यत नारायण सुर्वे,मंगेश पाडगांवकर,विं.दा सारख्या अनेक नावाजलेल्या महनीय व्यक्तींची दखल प्रतिष्ठाननं घेत त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. या मांदीयाळीत यंदा पळखेडच्या एका शेतक-याला अर्थात महानोरांना स्थान मिळालं आणि जनस्थान पुरस्काराच्यारूपानं त्यांच्या कवितेच्या वहीत आणखी एका मोरपिसाला स्थान मिळालं. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

महानोरांनी आपल्या ओबडधोबड जीवनाला आकार देणा-यांत तात्याचं स्थान मोठे होते असं प्रामाणिकपणे नमूद करण्याबरोबरच रसिकांनी मला लिहीण्याचं भक्कम बळ दिलं असंही कबूल करून टाकलं. कवितेसारखीच बरड माळरानावर नवी सृष्टी नवी निर्मिती करण्यातला माझा आनंद सांगता येणार नाही असंही ते सांगतात. महानोराकडे मोठेपणा फार आहे. मराठी भाषा,आपली माती आणि मायबाप रसिकांच्याप्रती त्यांचे ओतप्रेत भरलेलं प्रेमही सर्वांनाच भावते. निसर्ग आणि शेतीच्या सहवासात एकदा की महानोर गेले की मग झालचं त्यांच्या एकाग्र चिंतनातून जन्माला येतो कवितेचा नवा विषय,आशय. या स्फुरण्यातूनच त्याची सहजपणे कविता होते. पुढे कधीतरी या कवितेला चाल लावली जाते आणि ते थेट गाण्याच्या माध्यमातून चित्रपटात झळकते. महानोरांच्या ओठावर रूळलेल्या अनेक कवीता,रचनांनी नाटक,चित्रपटांत स्थान मिळवले आहे...या निसर्गकविची महती वर्णावी तेवढी कमीच ....व्वा,अप्रतिम,लाजवाब,त्यांच्या कवितांना मिळणारी दाद म्हणजे वन्समोअर...यासारके शब्दही त्यांच्यासाठी अपुरे पडतात...रसिकांचे प्रेम आणि भावाचा भूकेला असलेल्या आणि नेहमी नवनर्मितीचा ध्यास घेतलेल्या या निसर्गकवीला आपण फक्त मानाचा मुजला, सलाम एवढेच करू शकतो.....