Wednesday, March 7, 2012

किमयाची खरीच `किमया`...

आकुर्डी इथे राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबावर दोन दिवसांपूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची दोन महिन्यांची चिमुरडी किमया त्यांना सोडून गेली. मात्र या किमयाने हे जग सोडताना एक किमया केली. किमयाचं नेत्रदान तिच्या आईवडिलांनी केलंय. २ जानेवारीला किमया या चिमुरडीचा कुलकर्णी कुटूंबात जन्म झाला. मात्र जन्मापासूनच किमया आजारी होती. तीन मार्चला किमयाने या जगाचा निरोप घेतला. किमयाला आयुष्य मिळालं अवघं दोन महिन्यांचं.. कुलकर्णी कुटूंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. मात्र या दुःखातूनही खंबीरपणे कुलकर्णींनी किमयाचं नेत्रदान कऱण्याचा निर्णय घेतला. तिचं अस्तित्व तिच्या डोळ्यांच्या माध्यमातून टिकून आहे.

पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी किमयाला निरोप दिला असला तरीही किमयाचे डोळे कोणाला तरी आनंदी जीवन देतील. किमयाची आत्या आपल्या दोन महिन्यांच्या बाळाचं नेत्रदान करणं हा कठीण निर्णय आहे. मात्र कुलकर्णी कुटूंबाच्या या निर्णयामुळे माणुसकीचा नवा आदर्श निर्माण झालाय.

शांताबाईना सलाम....





तेलमालिश...दाढी...कटिंग सारखे शब्द पुरुषी आवाजातच बरे वाटतात...पण कोल्हापुरच्या शांताबाई यादव यांनी फक्त हे पुरुषी शब्द आपलेसे केले नाहीत तर पुरुषी मक्तेदारी असलेला हा व्यवसाय २५ पेक्षा जास्त वर्ष यशस्वीपणे करुन दाखवला....जगण्यासाठी सारं काही असं म्हणत जगणाऱ्या शांताबाईंच्या वेगळ्या वाटचालीवर साम मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट...

कोल्हापुराच्या वेशीवर असलेली गावं खरंतर कर्नाटकाच्या जवळ ...पण गावातल्या चालीरितीत मात्र कोल्हापुरी रांगडेपणा....अशाच या हसूर सासगिरी गावातल्या ह्या अगदी साध्या घरात राहतात...६५ वर्षांच्या शांताबाई यादव...लहानपणापासून करावे लागलेले कष्ट...हालअपेष्टा...यामुळे चेहऱ्यावर सुरुकुत्या आल्यात...पण अजूनही कामाची जिद्द काही जात नाही...अर्थात चुलीच्या आसापासचा रांधा वाढा....उष्टी काढा..ची दिनचर्चा संपली..की शांताबाई आपल्या पोटापाण्याच्या धंद्याला लागतात...(टॉवेल बांधताना...दाढी करतानाचे फास्ट शॉट्स....) पाहून आश्चर्य वाटलं ना...पण घाबरु नका..बाई अगदी सराईत आहेत...२५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव त्यांच्या सहजतेत दिसून येतो.......कोल्हापुरातल्या रांगडेपणा इथे मात्र एकदम साबणाच्या फेसासारखा मऊसूत होऊन जातो...(पुन्हा काही शॉट्स) न्हाव्याचा वडिलोपार्जित व्यवसाय..पतीच्या आकस्मिक निधनामुळे बंद झाला...चार पोरींच्या लग्नाची जबाबदारी असलेल्या शांताबाईंनी खरंतर काहीशा नाईलाजास्तव हा व्यवयाय स्वीकारला....या क्षेत्रात असलेली पुरुषांची मक्तेदारी लक्षात घेता आपल्याला हे जमेल का असा विचारही शांताबाईंच्या मनात आला.

सुरवातीला चर्चा झाली..पण हळूहळू शांताबाईंनी हसूरवाडी, हिडदुग्गी, कडाळ या गावात जावून लोकांची हजामत करण्यास सूरुवात केली. वर्षाला 30 किलो धान्यावर काही जणांनी त्यांच्याकडून वर्षभर केस कापून घेतले...हळूहळू शांताबाईंचा हात बसला आणि याच व्यवसायावर त्यांनी चारही पोरींची चांगल्या ठिकाणी लग्न केली..त्यांच्या या वेगळ्या कामगिरीबद्दल आणि जिद्दीबद्दल त्यांना पुरस्कारानेही गौरवण्यात आलं..पण आता मात्र त्या थकल्य़ा आहेत...गावातली दुकानं वाढल्याने ग्राहकांची संख्याही कमी झालीय...

बाई लय जिद्दी हाय..या शब्दात गावकरीही त्यांचं कौतुक करतात...

थंडगार आलीशान, ब्युटी सलून्स चालवणाऱ्या हायक्लास ब्युटिशियन्सना शांताबाईंच्या कामाचं नक्कीच कौतुक नसेल..पण गेल्या २५ पेक्षा जास्त वर्षांपासून खेडेगावात हजामत करुन आपल्या घरावर आलेली संकटं दूर करुन , गावातल्या माणसांबरोबर आपल्या कुटुंबाचं जगणंही त्यांनी सुंदर बनवलंय...एक नवा आदर्श निर्माण केलाय...