Wednesday, September 28, 2011

अनावश्यक कॉल्सची डोकेदुखी संपली...पण दर वाढणार


(मोबाईलसंदर्भात प्रत्येकाने वाचावा असा माहितीपूर्ण वाचनिय लेख....)
देशातील 90 कोटी मोबाईलधारकांची अनावश्यक 'कॉल्स' आणि 'एसएमएस'ची डोकेदुखी बंद झाली आहे. केव्हाही येणार कॉल्स आणि एसएमएस यावर ट्रायने कडक
उपाययोजना केल्या आहेत. टेरिफ रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (टीआरएआय) 27 सप्टेंबरपासून कोणत्याही 'सिम'वरुन एका दिवसाला 100 एसएमएस पाठविण्‍यावर प्रतिबंध घातले आहे. दिपावली, ईद आणि यासारख्या इतर मोठ्या सणांना मात्र मोबाईलधारकानांना सूट दिली जाणार आहे. सणासुदीला 100 पेक्षा जास्त एसएमएस पाठवू शकता येतील. बिनकामाचे कॉल्स आणि एसएमएसपासून तमाम मोबाईलधारकांचा सुटका करण्याचा विचार करताना ट्रायला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सपासून मोबाईलधारकांची सुटका करण्यासाठी सर्व मोबाईल यूजर्सवर हे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मात्र तरीही भविष्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे मत ट्रायशी संबंधित अधिकार्‍यांनी व्यक्त केले.
ट्रायने पाच सप्टेंबरला अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सवर प्रतिबंध घालण्यासाठी शिफारस केली होती. मात्र, त्यावेळी 'सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' ('सीओएआय')ने ट्रायकडे आपल्या अहवालावर फेरविचार करण्याची विनंती केली.
मोबाईलधारकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा:
'ट्राय'द्वारा अनावश्यक एसएमएस आणि कॉल्सवर लावण्यात आलेले प्रतिबंध म्हणजे मोबाईलधारकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे, असे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने ('सीओएआय') म्हटले आहे. सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस. मॅथ्यूज यांच्यामते ट्रायद्वारा निश्चित करण्यात आलेली 100 एसएमएसची मर्यादा ही देखील मोबाईलधारकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. अनेक मोबाईलधारकांच्या मते 100 एसएमएसची ‍मर्यादा फारच कमी आहे.
'एसएमएस' संवादाचे सोपे माध्यम:
संवाद साधण्यासाठी 'एसएमएस' हे अत्यंत सोपे माध्यम आहे. मोबाईलधारक एखाद्या वेळेस एसएमएस पाठवून संकटातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतो. जर त्याचा 100 एसएमएसचा कोटा संपल्यानंतर मात्र त्याच्याजवळ कोणताही पर्याय राहत नाही. यावरुन मोबाईलधारकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. असे सीओएआयचे महाव्यवस्थापक राजन एस. मॅथ्यूज यांनी ट्रायला गेल्या आठवड्यात लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
'डू नॉट कॉल' रजिस्टरमध्ये नोंद करा आणि चिंतामुक्त व्हा:
'डु नॉट कॉल' रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या मोबाईलधारकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. डू नॉट कॉल रजिस्टरमध्ये नोंदणी केलेल्या मोबाईलधारकांना जाहिरातींचे एसएमएस अथवा कॉल्सची चिंता करण्‍याचे कारण नाही. ट्रायने केलेल्या शिफारशीमध्ये मोबाईलधारकांना 'डू नॉट कॉल रजिस्टरमध्ये नोंद करण्याची आवाहन केले आहे.
नोंदणी केलेल्या ग्राहकांना जर असे जाहिरातींचे कॉल्स आलेच तर याबाबत त्याच्या टेलिफोन ऑपरेटरला तक्रार केल्यास त्या टेलिमार्केटिंग कंपनीला मोठा दंड भरावा लागेल.
पोस्टपेड कनेक्शनसाठी एका महिन्याला तीन हजार एसएमएस:
ट्रायने दिलेल्या शिफारसीमध्ये म्हटल्याप्रमाणे पोस्टपेड कनेक्शन असणार्‍या मोबाईलधारकांना एका महिन्यात केवळ 3,000 एसएमएस पाठविण्याची मुभा असावी. त्यापेक्षा जास्त एसएमएस पाठविण्याची त्यांना टेलिफोन ऑपरेटर्सने परवानगी देऊ नये.
दोन पर्याय:
अनावश्यक कॉल्स आणि एसएमएसच्या डोकेदुखीपासून मोबाईलधारकांची सुटका करण्यासाठी ट्रायने दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
पहिला पर्याय:
मोबाईलधारक 'फुली ब्लॉक्ड कॅटेगरी'ची निवड करू शकतो. हा पर्याय 'डू नॉट कॉल' रजिस्टर सारखाच आहे. 'फुली ब्लॉक्ड कॅटेगरी'ची निवड केल्यानंतर आपल्याला कोणताही व्यावसायिक कॉल्स अथवा एसएमएस येणार नाही. मोबाईलधारकांना नोंदणी करण्‍यासाठी इंग्रजीत कॅपिटल अक्षरात 'स्टार्ट' हा शब्द लिहून त्यानंतर एक स्पेस देत शून्य (0) हा अंक लिहावा. त्यानंतर हा एसएमएस 1909 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
दूसरा पर्याय:
मोबाईलधारक पार्शियली ब्लॉक्डची निवड करू शकतो. हा पर्याय निवडल्यानंतर त्याला काही निवडक व्यावसायिकांचेच एसएमएस येतील. यासाठी त्या ग्राहकाला आपल्या आवडीनुसार कंपन्यांची निवड करावी लागेल.
ट्रायने केली विभागणी:
पार्शियली ब्लॉक्ड पर्यायानुसार ट्रायने आठ भागात विभागणी केली आहे. बॅंकींग, विमा, क्रेडीट कार्ड, रियल एस्टेट, शिक्षण, आरोग्य, ग्राहक उपयोगी वस्तू व ऑटोमोबाईल, संचार, प्रसारण, मनोरंजन, पर्यटन आणि आयटी असे विभाग मोबाईलधारकांसाठी उपलब्ध असतील. संबंधीच्या सेवा पुरवणार्‍या टेलिमार्केटिंग कंपन्या त्यांच्या जाहिरातीचे एसएमएस अथवा कॉल्स करू शकतील.
...टेलिकॉम कंपन्यांचे धाबे बसणार परिणामी एसएमएसचे दर वाढतील?
ट्रायने मंगळवारी (27 सप्टेंबर) लागू केलेले प्रतिबंध टेलीकॉम कंपन्याच्या फायद्याचे नाही. कंपन्यांच्या मते यामुळे एसएमएस पाठवणार्‍या मोबाईलधारकांवर परिणाम होऊन त्यांची संख्या रोडावणार आहे. परिणाम तोटा भरून काढण्यासाठी टेलीकॉम कंपन्या एसएमएसच्या दरात वाढ करण्‍याची शक्यता आहे......(सौजन्य-दिव्य मराठी)

Monday, August 22, 2011

अण्णा- नावाचं महाराष्ट्रीयन वादळ

नवी दिल्लीत अण्णांना झालेल्या अटकेचे पडसाद देशासह राज्यातही उमटलेत. अण्णांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर उतरलीये.
उपोषणाला बसण्याआधीच अण्णा हजारेंना सकाळी सात वाजून २५ मिनिटांनी मयुर विहारमधून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याबरोबर अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि किरण बेदी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकलेल्या या आंदोलकांना पोलिसांनी अशा पद्धतीने ताब्यात घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले...ठिकठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध नोंदवला.
मायानगरी मुंबईतही अण्णांच्या अटकेचा तीव्र निषेध नोंदवला गेला. प्लीज अरेस्ट मी असं बॅनर पकडून अनेक तरुणांनी अण्णांनी दिलेल्या जेल भरोच्या आव्हानाला प्रतिसाद दिला....
अण्णांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तरुण-तरुणींसह सर्व वयोगटातील नागरिकांनी शांततामय मार्गाने मोर्चा काढला. यात बॅनर घेऊन मोठ्या संख्येने पुणेकर उतरले होते. आय ऍम अण्णा असं म्हणत प्रत्येकाने अण्णांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला. ...
करवीर नगरी कोल्हापूरातही मानवी साखळी उभारुन नागरिकांनी अण्णांना समर्थन दिलं....अण्णा नही आँधी है..दुसरे महात्मा गांधी है सारखे नारे देत अण्णांना पाठिंबा दर्शवला...
नाशिकमध्येही तिरंगा फडकावत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते...मी अण्णा आहे असं म्हणत या सगळ्यांनी अण्णांच्या अटकेचा निषेध केला..मी पण निर्दोष आहे..ला पण अटक करा असं म्हणत नारेबाजी केली.
अण्णांच्या राळेगणसिद्धी या गावातही लोकांनी शांततामय मार्गाने आंदोलन केलं. काल बत्ती बंदचं आव्हान केलेल्या समर्थकांनी आज गाव बंदची हाक दिली होती. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने लोक रस्यावर उतरले होते. यावेळी म्हशींचया अंगावर काँग्रेस नेत्यांची नावं लिहून त्यांचा निषेध करण्यात आला.
अमरावतीतही ज्येष्ठ नागरिक सन्मित्र मंडळाच्या वतीने अण्णांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. नागरिकांनी धरणा आंदोलन करुन लोकपाल बिल मंजूर झालंच पाहिजे अशी मागणी केली.
ठाण्यातही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नागरिक एकत्र जमले होते. लोकपाल बिलासाठी अण्णांच्या झालेल्या अटकेवर सर्वसामान्यांनी टीका केली.
औरंगाबादेतही मोठ्या संख्येने नागरिक रस्त्य़ावर उतरले...ज्येष्ठ नागरिकांनी धरणे आंदोलन करुन अण्णांना पाठिंबा दर्शवला तर तरुणांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढून अण्णांच्या अटकेचा निषेध नोंदवला...तर लहान मुलांनीही हातात झेंडे घेऊन आपल्ा पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा दिला...
कोकणातही तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती...हातात बॅनर घेऊन, घोषणा देत तरुणांनी अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला...बॅनरवरच्या मजकुराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं...
खालापूर तालुका समिती आणि खोपोली शहर समितीकडूनही आंदोलन करुन अण्णांना पाठिंबा दर्शवण्यात आला.
सोलापुरातही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले ते अण्णांना पाठिंबा दर्शवण्यासाठी...शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांनी घोषणाबाजीने सोलापुराचे रस्ते दणाणून सोडले...मोठ्या संख्येने रस्त्यावर पोलीस बंदोबस्तही होता...खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं...
अशा प्रकारे आपण एकजूटीनं अण्णांच्या बरोबर आहोत..असाच संदेश राज्यातील तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिकांनी दिला.....

असं आहे अण्णांच म्हणणं...

अण्णा हजारेंना अटक करण्यापासूनचा सरकारचा प्रत्येक निर्णय त्यांच्या अंगाशी येऊ लागलाय. त्यामुळं गेल्या दोन दिवसांत सरकारच्या प्रत्येक कृतीविषयी जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण होऊ लागलेत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना केलेली अटक केंद्र सरकारला चांगलीच महागात पडलीय. मंगळवारी सकाळी अण्णांना केलेल्या अटकेपासून आतापर्यंत सरकारनं घेतलेले अविचारी निर्णय सरकारच्याच अंगाशी आलेत. या सगळ्या घटनांमधून सर्वसामान्यांच्या मनात काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेत.
1. अण्णांना रामलीला मैदानावर उपोषण करण्याची परवानगी देणं सरकारला शक्य होतं, तर अशी परवानगी सुरुवातीलाच का देण्यात आली नाही?
वाढता जनप्रक्षोभ बघून बॅकफूटवर आल्यामुळंच हा निर्णय सरकारला घ्यावा लागला, हे न कळण्याइतपत जनता दूधखुळी नाही..
प्रश्न दुसरा. - अण्णांवर जाहीरपणे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करणाऱ्या केंद्र सरकारला काही तासांतच अण्णा हे गांधी असल्याचा साक्षात्कार का झाला.
एकीकडे काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी अण्णांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर काही तासांतच संसदेत गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अण्णांमधल्या गांधींचं दर्शन झालं.
प्रश्न तिसरा - अण्णांना अटक करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांचा होता, असा दिल्ली पोलिसांचा दावा होता. दिल्ली पोलिसांनी मात्र अटक करताना कुठलंही वॉरंट न बजावता, केवळ वरून आदेश असल्याचं का सांगितलं.
प्रश्न चौथा -
अण्णांची अटक ही दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई होती, तर त्यांच्या सुटकेचे आदेश केंद्र सरकारनं का दिले?
आणि शेवटचा प्रश्न म्हणजे उपोषणाच्या परवानगीचे राजकारण करण्याऐवजी केंद्र सरकार अण्णांच्या मूळ मागण्यांविषयी चर्चा का करत नाही?
या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं सरकारनं देणं गरजेचं आहे. मात्र यापैकी एकातरी प्रश्नाचं उत्तर सरकारकडं आहे का, हादेखील एक प्रश्नच आहे.

Friday, July 15, 2011

जुलैचा असाही योगायोग....

जुलै महिन्यात दहशतवाद्यांनी जगभरातील विविध शहरांना टार्गेट केलंय...जुलै महिन्यातच दहशतवाद्यांनी स्फोटही घडवून आणले...लंडन ,मुंबई ,अहमदाबाद आणि बंगळूरु यां शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्यात आले...

२९ जुलै २००३ ठिकाण: घाटकोपर(मुंबई) बेस्ट बसमध्ये सकाळी ९.१५ मि.बॉम्बस्फोट घडवण्यात आला.या स्फोटात ४ ठार,तर ३२ जण जखमी झाले

७ जुलै २००३ ठिकाण: लंडन सार्वजनिक ठिकाणांना अतिरेक्यांनी केलं टार्गेट भूमिगत मेट्रो स्टेशन आणि डबल डेकर बसमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले.यात ५२ लोक ठार झाली,तर ७०० जखमी झाले.

११ जुलै २००६ ठिकाण : मुंबई मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकल मध्ये ११ मिनिटात ७ साखळी बॉम्ब स्फोट,स्फोटासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला...यात २०९ लोक ठार,७०० जण जखमी

२५ जुलै २००८ ठिकाण: बंगळूर अतिरेक्यांनी साखळी बॉम्ब स्फोट घडवले,यात २ ठार तर २० जण जखमी झाले

२६ जुलै २००८ ठिकाण : अहमदाबाद दोन तासात झालेल्या बॉम्ब स्फोटात ४९ लोक ठार झाले,तर १२ जखमी झाले...या सर्व घटना पाहाता कुठेतरी जुलैचा योगायोग दिसून येतोय...

पुन्हा टार्गेट मुंबई....

मुंबई नेहमीच दहशतवाद्यांचा हिटलिस्टवर राहिलीय. २००२ पासून मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे, बसेस आणि गर्दीचे ठिकाण हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिलंय.
दोन डिसेंबर २००२ घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बसमध्ये शक्तीशाली स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर ३१ जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सिमीच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली होती.
सहा डिसेंबर २००२ मुंबईच्या सेंट्रल रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात पंचवीस जण जखमी झाले होते. एअर कंडिशनमध्ये बॉम्ब ठेवला होता. २७ जानेवारी २००३ विर्लेपार्ले इथल्या रेल्वेस्थानकावर झालेल्या स्फोटात ३० लोक जखमी झाले होते. संध्याकाळी झालेल्या स्फोटात एका सायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता.
१३ मार्च २००३ मुलुंड रेल्वेस्थानकावर शक्तीशाली बॉम्ब स्फोट झाला. या शक्तीशाली स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता तर ६५ जण जखमी झाले होते. २५ ऑगस्ट २००३ साली गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार इथं झालेल्या दुहेरी स्फोटात ५२ लोकांचा मृत्यू झाला होता.
११ जुलै २००६ मध्ये एकानंतर एक असे सात साखळी स्फोट झाले. या स्फोटात सुमारे २०९ जणांनी प्राण गमावला आणि सुमारे ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. लष्कर-ए-तोएबा आणि सिमीने स्फोट घडवले. सोमवारी या स्फोटाला पाच वर्ष पूर्ण झाली होती.

Monday, May 23, 2011

सर्व काही परमेश्वरावर....



पश्चिम बंगालच्या सिलिगुडी भागात अनोखी जुळी मुलं जन्माला आलीयत. या बाळांचं धड एक आहे आणि डोकी दोन आहेत. या बाळांना जन्म देणाऱ्या आईची प्रकृती ठीक आहे. पण या बाळांच्या जगण्याची शक्यता कमी वर्तवली जातेय.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी भागात एका महिलेनं एक धड पण दोन डोकी असलेल्या बाळाला जन्म दिलाय. हे बाळ साडेतीन किलो वजन असून त्याची उंची ४८ सेंटिमीटर आहे. काही वर्षांपूर्वी लक्ष्मी नावाच्या महिलेन अशाच जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र हा कोणताही चमत्कार नसल्याचं डॉक्टरांच म्हणण आहे. सध्या हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

कॉन्जॉईन ट्विन्स ही मेडिकल क्षेत्राला आव्हान देणारी केस आहे. या बाळांची स्थिती आशी आहे की त्यांना शस्त्रक्रिया करुन वेगळं करणंही अशक्य असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ही बाळं जिवंत राहण्याची शक्यताही फार कमी असते.

Saturday, March 5, 2011

तुम्ही सर्वजण आम्हाला हवे आहात!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नावाजलेले खेळाडू सर्वोत्तम कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पॉंटींग अशा मातब्बर खेळाडूंसाठी तर हा वर्ल्डकप अत्यंत महत्वाचा आहे. त्‍याचं महत्‍वाचं कारण म्‍हणजे ही स्‍पर्धा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची ठरण्‍याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळंच ही स्पर्धा स्वतःसाठी, देशासाठी आणि आपल्‍या चाहत्‍यांसाठी यादगार बनवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्‍कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्‍या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्‍याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्‍याच्‍या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही.
भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्‍या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्‍याची शक्यता खूपच कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई

तुम्ही sarvad सगळ्यानाच हवे आहात!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नावाजलेले खेळाडू सर्वोत्तम कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पॉंटींग अशा मातब्बर खेळाडूंसाठी तर हा वर्ल्डकप अत्यंत महत्वाचा आहे. त्‍याचं महत्‍वाचं कारण म्‍हणजे ही स्‍पर्धा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची ठरण्‍याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळंच ही स्पर्धा स्वतःसाठी, देशासाठी आणि आपल्‍या चाहत्‍यांसाठी यादगार बनवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्‍कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्‍या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्‍याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्‍याच्‍या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही. भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्‍या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्‍याची शक्यता खूपच कमी आहे.
ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई