Saturday, September 11, 2010

हे वागणं बरं नव्हं...!

कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभ म्हटला की,राजकारण्यांचा सहभाग असतोच,किंबहुना त्यांच्या सहभागाशिवाय असे सोहळे पार पाडणं म्हणजं जरा जिकरीचंच....याला राष्ट्रकुल स्पर्धेची क्विन्स बॅटन तरी कशी अपवाद असू शकते...राज्याच्या दौ-यावर असलेल्या या बॅटनच्या निमित्तानं सध्या राजकारण्यांची चमकूगिरी हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
खेळ, खेळाडू, संघ आणि पुढारी...हे एक एकमेकांशी संबंधीत घनिष्ट नातचं. त्यामुळंच स्थानिक,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच खेळांच्या संघटनावर खेळाडू, प्रशिक्षकांपेक्षा पुढारीच पदाधिकारी दिसतात. किंबहुना त्यांच्या आर्शिवाद, मार्गदर्शनाशिवाय संघटनांचं कार्य चालणं तसं अवघडच. आणि मग स्वभाविकच त्यांना स्पर्धा मग ती गल्लीतली असो कि दिल्लीतली प्रत्येक कार्यक्रमांसाठी बोलवणं अपरिहार्यच... कार्यक्रमास न बोलवणं, सत्कारासह योग्य आदरातिथ्य न ठेवल्यास त्यांचे रूसवे-फुगवे आणि संबंधितांवर काट धरत उट्टे काढणं आलेच....
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा बिगुल आता जोरात वाजू लागलंय. बॅटन रिले या स्पर्धेच्या संयोजन आणि उद्घाटन सोहळ्याचा महत्वपूर्ण भाग आहे, त्यामुळेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संयोजक या बॅटनची सर्वजण काळजी घेतांना दिसताय, हे खरं असलंतरी बॅटन स्वागताच्या निमित्तानं राजकारण्यांची चमकूगिरी दिसून येतेय. खेळाडूंपेक्षा बॅटन हातात घेऊन धावतांना आपलीच छबी वृत्तपत्रात, वाहिन्यांवर कशी झळकेल याची काळजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौरांसह इतर पुढारी घेतांना दिसतात. त्यासाठी अगदी खेळाडूं, जेष्ठ प्रशिक्षकांनाही मागे हटवून स्वतः पुढे येण्यासाठी चढाओढच पहायला मिळते, अगंदी आपणच स्पर्धेचं मुख्य संयोजक, यजमान आहोत, अशा थाटात हे सर्व पध्दतशीर सुरुय.
बॅटनचा कोल्हापूर, पुण्यामार्ग मुंबईत प्रवास सुरु झाला. या तिन्ही ठिकाणी राजकारण्यांच्या चमकूगिरी पहायला मिळाली. बॅटनचे जल्लोषात स्वागत झाले.सोहळा आटोपला आणि आपले फोटोसेशन कम्पिलट झाल्याची खात्री झाली की, हे सगळे चमकू पुढारी झाले एकदाचे मोकळे.....मग खेळाडू, प्रशिक्षक बॅटन पुढे घेऊन गेलेत की नाही, बॅटनचा प्रवास व्यवस्थित सुरुय की नाही, याचं त्यांना काही देणं घेणं नाही.
स्वतःच्या प्रसिध्दी नव्हे तर आपल्या शहर, जिल्ह्यात ही बॅटन आल्यानं तिचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच, असं स्वागताच्या कार्यक्रमातच ठामपणे सांगायलाही हे पुढारी विसरत नाही. प्रत्येकजण स्वागताच्या कार्यक्रमांशी संबंधीत आपलं मत ते ही अगदी सोयीस्करपणे मांडतांना सध्या दिसत आहे. ईद, गणेशोत्सवासारखे उत्सव असल्यानं बॅटनचा मुंबईतला प्रवास कमी केला. अन्यथा मुंबईत प्रत्येक भागातल्या पुढा-यांनं आपल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे बॅटनच स्वागत केलं असतं, एवढ्यावरच न थांबता आपली छबी चमकेल कशी याकडं केंद्रीत केलं असतं. बॅटननं २५ जूनला भारतात प्रवेश केला. आतापर्यत १६ हजार ६५२ किलोमिटरचा प्रवास पूर्ण झालाय. सर्व राज्यात खेळाडू, प्रशिक्षक,संघटनापेक्षा राजकारण्यांची चमकूगिरीच पहायला मिळाली. अनेक ठिकाणी बॅटनबरोबरच राष्ट्रकुलमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवर टीका झाली. पण त्यांला सोयीस्कर बगल देण्याचाही प्रयत्न संयोजकांच्या माध्यमातून पहायला मिळाला. बॅटन स्वागताच्या निमित्तानं अगदी महाराष्ट्रातसुध्दा हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांला पध्दतशीरपणे टाळले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रचार प्रसारास सर्वाधिक प्राधान्य संयोजन समितीनं दिलं, बॅटनच्या जोडीला आता कॉमनवेल्थ ट्रेनचाही प्रवास सुरु झालाय़. या प्रवासातही क्रीडाप्रेमींच्या जोडीला पुढा-यांची चमकूगिरी पहायला मिळतेय...पुढा-यांशिवाय क्रीडासंघटना, संस्थाचं पान हलत नाही...हे जरी खरं असलंतरी पुढा-यांनी खेळाडू, प्रशिक्षकांचा असलेल्या बॅटन स्वागताच्या कार्यक्रमात किती चमकूगिरी करावी हा एक प्रश्नच आहे.

Thursday, June 24, 2010

आदर्शवत उपक्रम...पण कायम स्वरूपी हवा


गोदावरीच्या स्वच्छतेतून सामाजिक-अध्यात्मिक क्रांती करण्याचा संकल्प श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांनी सोडलायं. "सकाळ माध्यम समूहा' च्या "गोदावरी वाचवा-प्रदूषण थांबवा' या अभियानात केंद्राने सहभाग घेतला.
तीन दिवस राबवलेल्या स्वच्छता मोहीमेची सांगता `गंगादशहरा` उत्सवानं झाली. गोदावरीपूजनासाठी गोदाकाठी श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी एकत्र आले होते. केंद्र प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी विधीवत गंगापूजन केलयं. पर्जन्य सुक्ताचं पठण सेवेकऱ्यांनी केल्यानंतर महाआरती झाली.
आरतीनंतर गोदामाईला आर्घ्य देण्यात आलं. यावेळी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी गोदावरी स्वच्छतेत योगदान देण्याचा शब्द दिला. गुरुमाऊलींनी स्वच्छतेचा उपक्रम दरमहा राबविण्याची सूचना सेवेकऱ्यांना केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍लांनी पौरोहित्य केलयं. सामुदायिक सहभागातून गोदावरीची स्वच्छता हेच गोदापूजन होयं, असा संदेश देत गंगादशहरा उत्सवानं दिलायं. गंगापूजनावेळी स्वच्छतेच्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याची आग्रही भूमिका सेवेकऱ्यांनी मांडलीयं. स्थैर्य, शांतता, समाधानाच्या जोडीलाच नैसर्गिक आपत्तीपासून मुक्त राहाण्याची शक्ती गोदामाईनं द्यावी, अशी प्रार्थना करत या अनोख्या उत्सवाची सांगता झालीयं.

एकच झेंडा घ्या हाती...

शिवसेना कार्यप्रमुख उद्वव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी काही ज्येष्ठ शिवसैनिक तसंच मनसैनिकांनी चळवळ सुरु केलीय. माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमखाली ही चळवळ सध्या सुरुय. याच चळवळींतर्गत मुंबईत शिवसैनिक आणि मनसैनिकांचा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यात उद्वव आणि राज यांना एकत्र आणण्याचा पुन्हा निर्धार करण्यात आला
राज आणि उद्वव ठाकरे हे दोन्ही भाऊ काही कारणांमुळं एकमेकांपास्न दूरावलं गेले. या भावाच्या विभक्तपणाचा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसतोय. त्याचप्रमाणं हिंदुमतांचीही विभागणी होऊ लागलीय. हेच लक्षात घेऊन या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी 16मे रोजी ज्येष्ठ शिवसैनिक सतिश वळूंज आणि त्याच्या सहा मित्रांनी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमद्वारे या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
याच चळवळीअतंर्गत वाळूंज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच राज आणि उद्वव यांना एक आवाहनात्मक पत्र पाठवलंय. शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्यासोबत राज आणि उद्वव असलेलं हे छायाचित्र आम्हाला हवंय. ते साकार व्हायला हवं असं वाळूंज यांची संकल्पना आहे.
यानिमित्तानं मेळाव्यास्थळी उभारण्यात आलेल्या पोष्टरवरही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत राज आणि उद्वव यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय.या मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याचअंतर्गत आगामी काळात एसएमसद्वारे तसंच नव्यान वेबसाईट सुरु करून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि गावपातळीपर्यत पोहचण्याचं ध्येय निश्चीत करण्यात आलंय.

Sunday, March 7, 2010

मथुरेतली कपडा फाड होली...


होळी हा पारंपारिक सण ठिकठिकाणी आपापल्या पद्धतीनं साजरा होतो. याला अर्थातच श्रीकृष्णाची मथुरानगरीही अपवाद नाही. मथुरेत हा उत्सव तीन-चार दिवस चालतो. धुलीवंदनानंतरचा हा दिवस`कपडा फाड होली` म्हणून परिचित आहे. यात महिला पुरुषाचे चक्क कपडे फाडतात...आपला विश्वास बसत नसेल पण हे सत्य आहे...
आपल्याकडे देश-प्रांतभागानिहाय सण,उत्सव साजरे करण्याची वेगळी परंपरा आहे. होळी,धुलीवंदन,रंगपंचमीसारखे सण म्हणजे नागरीकांच्या उत्साह,आनंदाला उधानच येते. श्रीकृष्णाच्या मथुरेसह इतर प्रांतात होळी,धुलीवंदनापासून सुरु होणारे हा उत्सव ४५ दिवस चालतो.
स्थानिक उत्सव समिती होळीच्या दिवसापासून रंगपंचमीच्या दिवसांपर्यत विशेष नियोजन करते. जास्तीत जास्त नागरीकांना या उत्सवात सहभागी करून घेतले जाते. मथुरावासिय सहकुटुंब या उत्सवात सहभागी होतात. सध्या तिथं हा अनोखा रंगोत्सव पहायला मिळतोय. त्यासाठी स्थानिक समितीनं दहा हजार किलो रंग उपलब्ध करून दिला आहे.
एकमेकांना रंग लावून तसेच या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
होळी,धुलीवंदनानंतरचा दिवस हा कपडा फाड होली म्हणून परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून मथुरावासिय हा दिवस कपडा फाडदिन म्हणून साजरा करतायं. महिला पुरुषांना रंग लावण्याबरोबरच त्यांचे चक्क कपडे ओढतात,फाडतात आणि त्यांना नखशिखांत भिजवतात. भगवान श्रीकृष्ण बलरामासोबत हा उत्सव पाहण्याचा आनंद घेतात. या दोघांच्या आनंदासाठीच हा नटखट,छेडछाडीचा उत्सव असतो.अशी येथील नागरीकांची श्रध्दा आहे.
या अनोख्या कपडा फाड होळीची ख्याती जगभर पसरलीय अनेक परदेशी पर्यटकही हा आगळावेगळा होलीत्सव पाहण्यासाठी आवर्जुन हजेरी लावलात. एवढंच नव्हे तर आपल्या कॅमेऱयात ही दृश्य बंदीस्त करतात.

Friday, February 19, 2010

आणि रिक्षाचालक बनला हायटेक

चेन्नईतल्या सॅमसन हा रिक्षाचालक परदेशी पाहुण्यांसाठी जवळचा मित्र बनलाय. त्यानं स्वतःच संकेतस्थळ तयार केलंय. इंटरनेटवरून नोंदणी करण्याबरोबरच मोबाईलवरून संपर्क साधल्यास तो सेवा देतो. याशिवाय पर्यटकांच्या एसएमएसलाही त्याच्याकडून त्वरीत प्रतिसाद मिळतो
१९९७ मध्ये चेन्नई दौऱ्यावर आलेल्या एका ब्रिटीश परदेशी पाहुण्यानं सॅमसनच्या रिक्षात बसून चेन्नई फिरण्याचा आनंद घेतला. याच प्रवासादरम्यान परदेशी पाहुण्यानं सॅमसनला इंग्रजी भाषा शिकण्याचे तसंच ग्राहकाला कस तयार करायचा याबाबतच्या काही टिप्स दिल्या.अर्थात सँमसनही या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत नंतरच्या तीन वर्षात इंग्रजी भाषा अवगत केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं एका जपानी पर्यटकांच्या इंटरनेटवर आपला ई-मेल आयडी तयार केला. त्यांच्या मेलला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानं पुढे२००६ मध्ये ब्रिटीश पर्यटकाच्या माध्यमातून ट्युकटेस्टींक डॉम कॉम नावाचं संकेतस्थळ तयार केले आणि चेन्नईतला हा रिक्षाचालक हायटेक बनला.
सॅमसनच्या संकेतस्थळाला दररोज किमान सोळा ते अठरा हजार लोक भेट देतात, अनेकजण आँनलाईनच आपली नोंदणी सॅमसंगकडे करतात. चेन्नईतल्या विविध स्थळांची माहीती घेतात, एवढेचं नव्हे तर त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून, तसंच एसएमएस पाठवून रिक्षा बोलावून घेतात, चेन्नईत येणारे परदेशी पाहुणे त्यांचे चांगले मित्र बनलेय, तो अशा परदेशा पाहुण्यांना आपल्या रिक्षातून संपूर्ण चेन्नई दर्शन घडवतो, त्यांच्या सेवेवर परदेशी पाहुणेही खुश असतात अत्याधुनिकतेशी नाळ जोडलेल्या सॅमसनची परदेशी पाहुण्यांना रिक्षाची सेवा उपलब्ध करून देतांना दमछाक होते सॅमसंगनं एवढ्यावरच न थांबता विविध भाषा शिकून घेतल्या. अर्थात या भाषांचा त्याचा व्यवसाय वाढीसाठी फायदा होतोय. अतिथी देवो भव...हे तत्व स्विकारून परदेशी पाहुण्यांना सेवा पुरवणाऱ्या सॅमसंगचा आदर्श इतर चालकांनी घ्यायला हवा

Wednesday, January 6, 2010

चिमुरड्यांचे असेही धाडस...

रत्नागिरीतली एक मोठी बहिण आपल्या लहानग्या बहिणीच्या आणि शिक्षणच्या प्रेमाखातरं तिला शिक्षणात मदत करतेय. लहानग्या बहिणीसाठी स्वतः होडी वल्हवुन खाडी पार करून ती तिला शाळेत पोहचवते. पाहूयात हा चिमकुलीच्या धाडसी शिक्षणाचा प्रवास....
कोकण....समुद्र आणि डोंगरदरीत वसलेला प्रदेश...असं हे कोकण दळणवळण आणि प्रवासासाठी अद्यापही दुर्लक्षित राहिलंय. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनाही हालअपेष्टा सहन कराव्या लागतायं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्‍वर तालुक्‍यात बावनदीच्या आसपास काही गाव वसलीयत.यातल्या परचुरी गावात चौथीपर्यत सोय आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोळंबे,संगमेश्‍वर गावात जावे. या गावाकडं जाण्यास दुरचा प्रवास करावा लागतो. पुल नसल्यानं त्यासाठी वेळही खूप जातो,मात्र त्यावर मात करतं या गावचं विद्यार्थी होडीतून दररोज ये-जा करतात. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांत लिंगायत भगिनींचा समावेश आहे.;त्यातली एक मोठी बहीण अंकिता ही लहान बहीण अनुष्कासाठी चक्क होडी वलवून शाळेसाठी सोडते.शाळा सुटताना ही अंकिता आपल्या संवगड्यांनाही घरी होडीतून आणते.
परचुरी गाव.... हे जवळपास दोन हजार लोकवस्तीचं. या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यानं नागरीकांना विविध प्रश्नांना तोंड द्याव लागतंय. दररोजचा होडीतून प्रवासही त्यांच्यासाठी जिकरीचा ठरत आहे.
शिक्षणाबाबत सरकारचे धोरण,भूमिका काय हे आपणास माहित आहे. मात्र कोकणातल्या या भगिनींचे शिक्षणाविषयी प्रेम काही वेगळंच आहे. गावाजवळ पुढारी आणि अधिकाऱ्यांना पुल बांधायला अद्याप मुहूर्त सापडला नाहीय. मात्र त्याकडं दुर्लक्ष करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या लिंगायत भगिनींनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातलंय असं म्हणता येईल..

Tuesday, November 17, 2009

विक्रमांचा बादशहा

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटप्रेमींचा देव... क्रिकेटच्या या अनभिषिक्त सम्राटानं विश्वविक्रमांचे डोंगर रचलेत. त्यानं तमाम क्रिकेटरसिकांना नेहमीच आपल्या सहजसुंदर फलंदाजीनं मंत्रमुग्ध केलंय. त्यामुळेच लाडका सचिन क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातल्या ताईत बनलाय.
सचिन रमेश तेंडुलकर....मूळचा मुंबईकर...जन्म २४ एप्रिल १९७३...वय३६वर्षे...उंची ५फूट ५ इंच...काहीसं एवढंच वर्णन ऐकलं की,समोर मुर्ती उभी राहते सचिन तेंडुलकरची. मुर्ती लहान पण किर्ती महान...हे शब्द तेंडुलकरच्या बाबतीत खरोखरच तंतोतंत खरे ठरतात किंबहुना त्यानेच ते खरे करून दाखवलेत. सचिननं वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याला १५नोव्हेंबर १९८९ला कराचीत भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या सामन्यात संधी मिळाली. या सामन्यातला सहभाग त्याला परमोच्च आनंद देणारा ठरला. सामन्यात त्याला टेस्ट कॅप मिळाली आणि सचिन भारतीय संघाचा अधिकृत फलंदाज झाला. पण या सामन्यात त्याला फलंदाजीस वाव मिळाला नाही.

६ मार्च १९९०ला वेलिंग्टन इथल्या न्युझीलंडविरूध्दच्या सामन्यात एक धाव नोंदवत त्यानं आपल्या धावांची सुरवात केली. खेळण्यास सुरवात केल्यानंतर बरोबर २वर्षानंतर१९९२ला त्यानं एक हजार धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर त्यानं पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या धावांच्या सरासरीकडे लक्ष दिल्यास प्रत्येक वर्षी साधारणतः एक हजार धावा जमा करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवलेले दिसते.एवढेच नव्हे तर हे उद्दीष्ट साध्य करायचंच या ध्येयानं तो आपली खेळी करतांना दिसतो.

कसोटी कि एकदिवसीय सामना अर्धशतक,शतक झळकवत त्यानं आपली घौडदौड सुरुच ठेवली. पाकिस्तान,न्युझीलंड,आँस्ट्रेलिया,इंग्लड..अशा सर्वच प्रतिस्पर्ध्याविरूध्द त्यानं कौतुकास्पद कामगिरी केली. केवळ आपल्या धावा वाढवण्याकडं अथवा फक्त कारकीर्दीकडं सचिननं कधीही लक्ष दिले नाही.संघ अडचणीत असतांना एक खांबी तंबूसारखा मैदानावर थांबणारा सचिन टीम इंडियाला नेहमीच आधार वाटलायं. किंबहुनां त्यांच्या सर्वीत्तम खेळीनंच भारतीयाला अनेकदा विजय मिळवून देत हे सिध्दही केलंय. दहा,पंधरा हजारांनंतर ५ नोव्हेंबर२००९ ला त्यानं पुर्ण केलेल्या १७हजार धावा हे त्यांच्या खेळाचं वेगळेपण म्हणता येईल.

सचिन आता थकलाय,त्यानं निवृत्त व्हावं या सल्लाला सचिननं एकदिवसीय सामना,कसोटी असो की टवेंटी-२० अशा सर्वच सामन्यात सर्वीत्तम खेळ करत चोख प्रत्युत्तर दिलंय. सचिन आपल्या मित्रपरिवारात तेंडल्या,लिटल चॅम्यियन्स या टोपन नावानं ओळखला जातो. शाकाहारी आणि मांसाहारी आहार त्याला घ्यायला आवडतो. मराठीबरोबरच इंग्रजी,हिंदी भाषा त्याला येतात. साहस,रहस्यमय कथा वाचण्यांबरोबरच चित्रपट पहायला त्यांला आवडते. जुनी गाजलेली हिंदी,मराठी गाणी ऐकणे हा त्यांचा छंद आहे. याशिवाय स्कुबा डायव्हींगसह साहसी खेळात सहभागी व्हायला त्याला नेहमी आवडते.

अनेकदा भारतीय संघातल्या सहकाऱ्यांबरोबर हे खेळ खे्ळायला तो प्राधान्य देतो. विश्व विक्रमांचे डोंगर रचणाऱ्या सचिननं गर्व,अहंकाराला आपल्यापासनं दूरच ठेवलंय. आक्रमकतेपेक्षा संयमाला प्राधान्य द्यायला त्याला आवडते. क्रिकेटरसिकांना त्यांच्या खेळातून हा प्रत्यय नेहमीच आलायं. सचिन कुंटुबवत्सलही आहे. क्रिकेटचा दौरा नसेल त्यावेळेस आपला जास्तीत जास्त वेळ तो कुटुंबास देतो. आपल्या कारकीर्दीचा २० वर्षाचा टप्पा त्यानं गाठलायं. सचिननं कायमच खेळत राहावे,विक्रमाचे असेच डोंगर रचावेत अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.