Monday, May 23, 2011

सर्व काही परमेश्वरावर....



पश्चिम बंगालच्या सिलिगुडी भागात अनोखी जुळी मुलं जन्माला आलीयत. या बाळांचं धड एक आहे आणि डोकी दोन आहेत. या बाळांना जन्म देणाऱ्या आईची प्रकृती ठीक आहे. पण या बाळांच्या जगण्याची शक्यता कमी वर्तवली जातेय.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी भागात एका महिलेनं एक धड पण दोन डोकी असलेल्या बाळाला जन्म दिलाय. हे बाळ साडेतीन किलो वजन असून त्याची उंची ४८ सेंटिमीटर आहे. काही वर्षांपूर्वी लक्ष्मी नावाच्या महिलेन अशाच जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र हा कोणताही चमत्कार नसल्याचं डॉक्टरांच म्हणण आहे. सध्या हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

कॉन्जॉईन ट्विन्स ही मेडिकल क्षेत्राला आव्हान देणारी केस आहे. या बाळांची स्थिती आशी आहे की त्यांना शस्त्रक्रिया करुन वेगळं करणंही अशक्य असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ही बाळं जिवंत राहण्याची शक्यताही फार कमी असते.

Saturday, March 5, 2011

तुम्ही सर्वजण आम्हाला हवे आहात!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नावाजलेले खेळाडू सर्वोत्तम कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पॉंटींग अशा मातब्बर खेळाडूंसाठी तर हा वर्ल्डकप अत्यंत महत्वाचा आहे. त्‍याचं महत्‍वाचं कारण म्‍हणजे ही स्‍पर्धा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची ठरण्‍याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळंच ही स्पर्धा स्वतःसाठी, देशासाठी आणि आपल्‍या चाहत्‍यांसाठी यादगार बनवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्‍कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्‍या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्‍याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्‍याच्‍या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही.
भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्‍या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्‍याची शक्यता खूपच कमी आहे. ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई

तुम्ही sarvad सगळ्यानाच हवे आहात!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नावाजलेले खेळाडू सर्वोत्तम कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पॉंटींग अशा मातब्बर खेळाडूंसाठी तर हा वर्ल्डकप अत्यंत महत्वाचा आहे. त्‍याचं महत्‍वाचं कारण म्‍हणजे ही स्‍पर्धा त्यांच्या कारकीर्दीतील अखेरची ठरण्‍याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळंच ही स्पर्धा स्वतःसाठी, देशासाठी आणि आपल्‍या चाहत्‍यांसाठी यादगार बनवण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा मातब्बर संघाबरोबरच नवख्या संघाच्या सहभागामुळं वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. क्रिकेट स्पर्धेला दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं आणि यजमान भारत-बांग्लादेश दरम्यानच्या धडाकेबाज सामन्यानं सुरुवात झालीय. स्पर्धेतल्या काही लढती शेवटपर्यंत उत्‍कंठावर्धक होतील, तर काही कंटाळवाण्या होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही स्पर्धा संपेल त्यावेळेस एकीकडं विजेता संघ जल्लोषात बुडालेला असेल, तर दुसरीकडं काही दिग्गज खेळाडू अखेरचा वर्ल्डकप म्हणून जुन्या आठवणीत रमलेले असतील. वाढत्‍या वयामुळं सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, मुथय्या मुरलीधरन, रिकी पाँटिंग अशा मातब्बरांसाठी हा वर्ल्डकप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळंच या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्‍याबरोबर रेकॉर्ड नोंदवण्याचं टार्गेट या खेळाडूंसमोर असेल.
पाँटिंगनं १९९९, २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाच्या स्पर्धेतही तोच कर्णधार आहे. मुरलीधरन १९९६च्या वर्ल्डकप विजेत्या संघात खेळला होता. यावेळी हे दोघेही पुन्हा एकदा वर्ल्डकप हातात घेण्यास उत्सुक आहेत. सचिन तेंडुलकरची गोष्ट थोडी वेगळी आहे. सचिनचा हा सहावा वर्ल्डकप आहे. पण त्‍याच्‍या कारकीर्दीत भारताला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. ती कसर भरून काढण्यासाठी यंदा त्याला ही बहुधा अखेरची संधी आहे. कॅलिसचंही यापेक्षा वेगळं नाही. त्यानंही आतापर्यंत वर्ल्डकप विजयाचा आनंद घेतलेला नाही. भारतासाठी केवळ तेंडुलकरसाठीच हा वर्ल्डकप कदाचित अखेरचा ठरणार नाही, तर विरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचाही बहुतेक हा वर्ल्डकप अखेरचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुखापती आणि वाढलेल्‍या वयामुळं त्यांना २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ते सहभागी होण्‍याची शक्यता खूपच कमी आहे.
ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर पाँटिंगबरोबरच वेगवान गोलंदाज ब्रेट लीलासुद्धा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही अखेरची संधी आहे. आता तो ३४ वर्षांचा आहे. त्यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून याअगोदरच निवृत्ती जाहीर केलीय. पुढील वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक संख्येनं ज्यांचे खेळाडू दिसणार नाहीत तो संघ म्हणजे श्रीलंका. या संघातले कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान हे तिघेही तिशीच्या पुढचे आहेत. यांच्यासाठी हा वर्ल्डकप अखेरचाच असेल. पाकिस्तानचे शोएब अख्तर, कसोटी कर्णधार मिसबाह उल हक, युनूस खान हेदेखील तेहतीसच्यावर आहे. तेसुध्दा या वर्ल्डकपनंतर पुढील स्पर्धेत दिसणार नाहीत. वेस्ट इंडिजमध्ये ख्रिस गेल, शिवनारायण चंदरपॉल, रामनरेश सरवान हे बत्तीसच्या पुढे असल्यानं त्यांच्यासाठीही हा बहुधा शेवटचा वर्ल्डकप असेल. इंग्लिश संघात कर्णधार अँड्र्यू स्ट्राऊस, पॉल कॉलिंगवूड हे अनुक्रमे चौतीस आणि पस्तीशीचे आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हिटोरी, अष्टपैलू स्कॉट स्टायरिस, जेकब ओराम हे देखील २०१५ मध्ये खेळण्याची शक्यता नाही.
श्रीकृष्ण कुलकर्णी, साम मराठी मुंबई

Saturday, November 27, 2010

मराठी बाणा जपणारा लोकशाहीर

लोकशाहीर विठ्ठल उमप....उर्फ सर्वांचे अण्णा....महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा ठेवा जपणारा ऐंशी वर्षाचा एक उमदा...कलावंत...आपल्या जेष्ठत्वावर मात करत तरूणांना लाजवेल असंच जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तीमत्व...शाहीरीला जागतिकस्तरावर वेगळं स्थान, नावलौकीक मिळवून देणारे लोकशाहीर आपल्यातून इतक्या सहजपणे जातील, याची कुणालाही कल्पना नव्हती....
नाशिकला कालीदास कलामंदीरात झालेल्या एका कार्यक्रमांसाठी उमप आले होते...त्याचे जांभुळ आख्यान नाटक आणि मी मराठी हे अलिकडच्या काळातील कलाविष्कार मी पाहिले होते. त्यामुळं त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती...पण त्यांच्याभोवती असलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळं ते सहज शक्य होत नव्हतं...अखेर पत्रकार असल्यानं आपल्या पत्रकारितेचा त्यांच्या भेटीसाठी वापर करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांच्याच जवळच्या एका कार्यकर्त्यांला जवळ घेऊन शाहीरांशी गप्पा मारण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे हवी, असं सांगितलं. त्या कार्यकर्त्यांनंही लगेच शाहीरांच्या कानात निरोप सांगितला आणि काय आश्चर्य काही वेळानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून ते बॅक स्टँजला असलेल्या कक्षात आले आणि मग काय सुरु झाली गप्पाची मैफल...कौटुंबिक परिवार, शालेय शिक्षण, शाहीरीची सुरवातीपासून तर जांभुळ आख्यान आणि अगदी अलिकडच्या मी मराठी कलाविष्कारापर्यत गप्पाची मैफल रंगत गेली...मध्येच मी गाण्यांची फर्माईश करत आणि शाहीरानीही मोठ्या अदबीनं फु बाई फु, माझी मैना गावाकडं राहिली,फाटकी नोट, ए दादा आवर ये...अशी गाण गात मला सुखद अनुभव दिला...आंबेडकरी चळवळीतील आठवणी सांगतांना त्यांनी हा माझ्या भीमरायाचा मळा...हे गाजलेले गीत ऐकवत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा महिमाच माझ्यासमोर कथन केला....एवढ्या वयांतही त्यांच्या आवाजातला एक वेगळा बाज मला अनुभवायला मिळत होता...केवळ विचारलेल्या प्रश्नांनाच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक माहीती मला त्यांच्या बोलण्यातून जाणवली...त्यांचे काही काही प्रसंग तर थक्क करून सोडणारं होते....पोवाडा, कव्वाली भारूड, गझल अभंग की छक्कड लावणी असो असे सारंच प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचां त्यांचा वेगळा हातखंड मला पहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाला...गप्पाची मैफल सुरु असतांनाच मध्येच आपल्या स्वयंसेवकांकडून कार्यक्रमांच्या तयारीचा आढावाही ते घेत होते....मी त्यांच्याकडं फक्त दहा मिनिटांची वेळ मागितली होती मात्र शाहीरांनी माझ्याशी तब्बल पंचवीस मिनिटे गप्पा मारल्या...गप्पानंतर ते लगेचच आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी रंगमंचाकडे गेले...मात्र जाण्यापूर्वी त्यांनी माझं नाव पुन्हा एकदा विचारलं...मी नाव सांगितलं श्रीकृष्ण कुलकर्णी...श्रीकृष्ण म्हणजे किसना, कृष्णा होय...बरं बघ तुझ्यावरही मी एक गाणं रचलय..मी लगेचच म्हटंल कुठले ते...आणि त्यांनी लगेचच कृष्णा धमाल रे...हे प्रसिध्द गाणं म्हणतं गात रंगमंचाकडं जाण्यास सुरवात केली...मी फक्त त्यांच्या या अनोख्या व्यक्तीमत्वाकडं पाहतंच राहिलो....

Monday, September 13, 2010

भाजप नेते म्हणतात योगायोग...

अलाहाबाद उच्च न्यायालयानं अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात २४ सप्टेंबर ही तारीख निश्चित केलीय. म्हणजे अयोध्यप्रश्नी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेचा विसावा वर्धापनदिन २३ तारखेला एक दिवस अगोदर आहे. असं असलंतरी भाजप या निकालाबाबत आशावादी आहे.अयोध्याप्रश्नी भाजपमध्ये सध्या शांतता आहे. हा निकाल न्यायालयात असल्यानं भाजप नेते कुणीही या वक्तव्यावर मत व्यक्त करण्यात तायर नाही. निकालाबाबत पक्षानं वेट अँन्ड वॉचची भूमिका स्विकारलीय.
हे खरं असलं तरी अडवानी यांनी आपल्या ताज्या ब्लॉगवरील लेखात अयोध्यानिकाल आणि आपल्या रथयात्रेला वीस वर्ष पूर्ण याविषयी विवेचन केलय. या दोन्ही घटना एक दिवसाआड पाठोपाठ येत आहे. अडवानींनी म्हणतात,माझे रोल मॉडेल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मतारीख 25 सप्टेंबर आहे. सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्राही 1990 मध्ये त्याच दिवशी काढली. त्याच दिवशी मी अजूनही नियमितपणं सोरटी सोमनाथाच्या दर्शनासाठी जातो. आता तर अयोध्या प्रकरणाचा निकाल 25 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारांय. हा सर्व योगायोग असल्याचे मी मानतो असं नमूद केलय. अयोध्या प्रकरणी पक्षनेते काहीही बोलण्यास तयार नाही,असं असलंतरी दर आठवड्याला भाजप मुख्यालयाशेजारी आंग्लभाषिक पत्रकारांचा दरबारच भरलेला दिसतो. त्यामुळं पक्षने त्यांची गोची झालीय. त्यांना पत्रकारांना काहीच माहिती देता येत नाही.
पक्षाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर नितीन गडकरीनी अयोध्या प्रश्‍न घटनेच्या चौकटीत सुटावा, असं मत मांडलं होतं. भाजपमध्ये सध्या गडकरी गट विरूध्द राजनाथसिंह गट यांच्यात शीतयुद्धाचं वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकालानंतर गडकरी यांचे ते मत कायम राहील काय, काय पडसाद उमटतात याबाबतही उत्सुकता आहे. निकाल विरोधात गेल्यास काही वरिष्ठ नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठावण्याचं निश्चित केलंय. अयोध्या प्रकरणाबाबत लिबरहान आयोगाचा अहवाल फेटाळणाऱ्या भाजपची केंद्रात सहा वर्षे सत्ता होती. त्यावेळेस हा अहवाल का आणला गेला नाही, अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल त्या काळात का लागला नाही, या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे नाहीत.

Saturday, September 11, 2010

हे वागणं बरं नव्हं...!

कुठल्याही स्पर्धेचा उद्घाटन, पारितोषिक वितरण समारंभ म्हटला की,राजकारण्यांचा सहभाग असतोच,किंबहुना त्यांच्या सहभागाशिवाय असे सोहळे पार पाडणं म्हणजं जरा जिकरीचंच....याला राष्ट्रकुल स्पर्धेची क्विन्स बॅटन तरी कशी अपवाद असू शकते...राज्याच्या दौ-यावर असलेल्या या बॅटनच्या निमित्तानं सध्या राजकारण्यांची चमकूगिरी हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय.
खेळ, खेळाडू, संघ आणि पुढारी...हे एक एकमेकांशी संबंधीत घनिष्ट नातचं. त्यामुळंच स्थानिक,राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वच खेळांच्या संघटनावर खेळाडू, प्रशिक्षकांपेक्षा पुढारीच पदाधिकारी दिसतात. किंबहुना त्यांच्या आर्शिवाद, मार्गदर्शनाशिवाय संघटनांचं कार्य चालणं तसं अवघडच. आणि मग स्वभाविकच त्यांना स्पर्धा मग ती गल्लीतली असो कि दिल्लीतली प्रत्येक कार्यक्रमांसाठी बोलवणं अपरिहार्यच... कार्यक्रमास न बोलवणं, सत्कारासह योग्य आदरातिथ्य न ठेवल्यास त्यांचे रूसवे-फुगवे आणि संबंधितांवर काट धरत उट्टे काढणं आलेच....
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा बिगुल आता जोरात वाजू लागलंय. बॅटन रिले या स्पर्धेच्या संयोजन आणि उद्घाटन सोहळ्याचा महत्वपूर्ण भाग आहे, त्यामुळेच खेळाडू, प्रशिक्षक आणि संयोजक या बॅटनची सर्वजण काळजी घेतांना दिसताय, हे खरं असलंतरी बॅटन स्वागताच्या निमित्तानं राजकारण्यांची चमकूगिरी दिसून येतेय. खेळाडूंपेक्षा बॅटन हातात घेऊन धावतांना आपलीच छबी वृत्तपत्रात, वाहिन्यांवर कशी झळकेल याची काळजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौरांसह इतर पुढारी घेतांना दिसतात. त्यासाठी अगदी खेळाडूं, जेष्ठ प्रशिक्षकांनाही मागे हटवून स्वतः पुढे येण्यासाठी चढाओढच पहायला मिळते, अगंदी आपणच स्पर्धेचं मुख्य संयोजक, यजमान आहोत, अशा थाटात हे सर्व पध्दतशीर सुरुय.
बॅटनचा कोल्हापूर, पुण्यामार्ग मुंबईत प्रवास सुरु झाला. या तिन्ही ठिकाणी राजकारण्यांच्या चमकूगिरी पहायला मिळाली. बॅटनचे जल्लोषात स्वागत झाले.सोहळा आटोपला आणि आपले फोटोसेशन कम्पिलट झाल्याची खात्री झाली की, हे सगळे चमकू पुढारी झाले एकदाचे मोकळे.....मग खेळाडू, प्रशिक्षक बॅटन पुढे घेऊन गेलेत की नाही, बॅटनचा प्रवास व्यवस्थित सुरुय की नाही, याचं त्यांना काही देणं घेणं नाही.
स्वतःच्या प्रसिध्दी नव्हे तर आपल्या शहर, जिल्ह्यात ही बॅटन आल्यानं तिचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच, असं स्वागताच्या कार्यक्रमातच ठामपणे सांगायलाही हे पुढारी विसरत नाही. प्रत्येकजण स्वागताच्या कार्यक्रमांशी संबंधीत आपलं मत ते ही अगदी सोयीस्करपणे मांडतांना सध्या दिसत आहे. ईद, गणेशोत्सवासारखे उत्सव असल्यानं बॅटनचा मुंबईतला प्रवास कमी केला. अन्यथा मुंबईत प्रत्येक भागातल्या पुढा-यांनं आपल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळाद्वारे बॅटनच स्वागत केलं असतं, एवढ्यावरच न थांबता आपली छबी चमकेल कशी याकडं केंद्रीत केलं असतं. बॅटननं २५ जूनला भारतात प्रवेश केला. आतापर्यत १६ हजार ६५२ किलोमिटरचा प्रवास पूर्ण झालाय. सर्व राज्यात खेळाडू, प्रशिक्षक,संघटनापेक्षा राजकारण्यांची चमकूगिरीच पहायला मिळाली. अनेक ठिकाणी बॅटनबरोबरच राष्ट्रकुलमध्ये झालेल्या गैरव्यवहारांवर टीका झाली. पण त्यांला सोयीस्कर बगल देण्याचाही प्रयत्न संयोजकांच्या माध्यमातून पहायला मिळाला. बॅटन स्वागताच्या निमित्तानं अगदी महाराष्ट्रातसुध्दा हा प्रश्न उपस्थित झाला, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांला पध्दतशीरपणे टाळले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या प्रचार प्रसारास सर्वाधिक प्राधान्य संयोजन समितीनं दिलं, बॅटनच्या जोडीला आता कॉमनवेल्थ ट्रेनचाही प्रवास सुरु झालाय़. या प्रवासातही क्रीडाप्रेमींच्या जोडीला पुढा-यांची चमकूगिरी पहायला मिळतेय...पुढा-यांशिवाय क्रीडासंघटना, संस्थाचं पान हलत नाही...हे जरी खरं असलंतरी पुढा-यांनी खेळाडू, प्रशिक्षकांचा असलेल्या बॅटन स्वागताच्या कार्यक्रमात किती चमकूगिरी करावी हा एक प्रश्नच आहे.

Thursday, June 24, 2010

आदर्शवत उपक्रम...पण कायम स्वरूपी हवा


गोदावरीच्या स्वच्छतेतून सामाजिक-अध्यात्मिक क्रांती करण्याचा संकल्प श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकऱ्यांनी सोडलायं. "सकाळ माध्यम समूहा' च्या "गोदावरी वाचवा-प्रदूषण थांबवा' या अभियानात केंद्राने सहभाग घेतला.
तीन दिवस राबवलेल्या स्वच्छता मोहीमेची सांगता `गंगादशहरा` उत्सवानं झाली. गोदावरीपूजनासाठी गोदाकाठी श्री समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी एकत्र आले होते. केंद्र प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी विधीवत गंगापूजन केलयं. पर्जन्य सुक्ताचं पठण सेवेकऱ्यांनी केल्यानंतर महाआरती झाली.
आरतीनंतर गोदामाईला आर्घ्य देण्यात आलं. यावेळी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी गोदावरी स्वच्छतेत योगदान देण्याचा शब्द दिला. गुरुमाऊलींनी स्वच्छतेचा उपक्रम दरमहा राबविण्याची सूचना सेवेकऱ्यांना केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍लांनी पौरोहित्य केलयं. सामुदायिक सहभागातून गोदावरीची स्वच्छता हेच गोदापूजन होयं, असा संदेश देत गंगादशहरा उत्सवानं दिलायं. गंगापूजनावेळी स्वच्छतेच्या कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करण्याची आग्रही भूमिका सेवेकऱ्यांनी मांडलीयं. स्थैर्य, शांतता, समाधानाच्या जोडीलाच नैसर्गिक आपत्तीपासून मुक्त राहाण्याची शक्ती गोदामाईनं द्यावी, अशी प्रार्थना करत या अनोख्या उत्सवाची सांगता झालीयं.