Monday, March 2, 2009

सलाम निसर्गकवीला


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे....अशी भव्य कल्पना घेऊन मानवी कल्याणासाठी प्रार्थना करणारे,निसर्गाबरोबरच माणसाशी तादात्म्य पावलेले निसर्गकवी नामदेव धोंडो तथा ना.धो.महानोर.यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठाननं मानाचा जनस्थान पुरस्कार देऊन नुकतच सन्मानित केलं. त्याबद्दल प्रथम निसर्गकवीला सलाम

नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणजे एक सांस्कृतिक अधिष्ठानचं. या प्रतिष्ठानची धुरा याच क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींच्या हातात असल्यानं तात्यानंतरही खरोखरच यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. आतापर्यत नारायण सुर्वे,मंगेश पाडगांवकर,विं.दा सारख्या अनेक नावाजलेल्या महनीय व्यक्तींची दखल प्रतिष्ठाननं घेत त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. या मांदीयाळीत यंदा पळखेडच्या एका शेतक-याला अर्थात महानोरांना स्थान मिळालं आणि जनस्थान पुरस्काराच्यारूपानं त्यांच्या कवितेच्या वहीत आणखी एका मोरपिसाला स्थान मिळालं. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

महानोरांनी आपल्या ओबडधोबड जीवनाला आकार देणा-यांत तात्याचं स्थान मोठे होते असं प्रामाणिकपणे नमूद करण्याबरोबरच रसिकांनी मला लिहीण्याचं भक्कम बळ दिलं असंही कबूल करून टाकलं. कवितेसारखीच बरड माळरानावर नवी सृष्टी नवी निर्मिती करण्यातला माझा आनंद सांगता येणार नाही असंही ते सांगतात. महानोराकडे मोठेपणा फार आहे. मराठी भाषा,आपली माती आणि मायबाप रसिकांच्याप्रती त्यांचे ओतप्रेत भरलेलं प्रेमही सर्वांनाच भावते. निसर्ग आणि शेतीच्या सहवासात एकदा की महानोर गेले की मग झालचं त्यांच्या एकाग्र चिंतनातून जन्माला येतो कवितेचा नवा विषय,आशय. या स्फुरण्यातूनच त्याची सहजपणे कविता होते. पुढे कधीतरी या कवितेला चाल लावली जाते आणि ते थेट गाण्याच्या माध्यमातून चित्रपटात झळकते. महानोरांच्या ओठावर रूळलेल्या अनेक कवीता,रचनांनी नाटक,चित्रपटांत स्थान मिळवले आहे...या निसर्गकविची महती वर्णावी तेवढी कमीच ....व्वा,अप्रतिम,लाजवाब,त्यांच्या कवितांना मिळणारी दाद म्हणजे वन्समोअर...यासारके शब्दही त्यांच्यासाठी अपुरे पडतात...रसिकांचे प्रेम आणि भावाचा भूकेला असलेल्या आणि नेहमी नवनर्मितीचा ध्यास घेतलेल्या या निसर्गकवीला आपण फक्त मानाचा मुजला, सलाम एवढेच करू शकतो.....

No comments:

Post a Comment