
राज आणि उद्वव ठाकरे हे दोन्ही भाऊ काही कारणांमुळं एकमेकांपास्न दूरावलं गेले. या भावाच्या विभक्तपणाचा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसतोय. त्याचप्रमाणं हिंदुमतांचीही विभागणी होऊ लागलीय. हेच लक्षात घेऊन या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी 16मे रोजी ज्येष्ठ शिवसैनिक सतिश वळूंज आणि त्याच्या सहा मित्रांनी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा या फोरमद्वारे या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
याच चळवळीअतंर्गत वाळूंज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच राज आणि उद्वव यांना एक आवाहनात्मक पत्र पाठवलंय. शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्यासोबत राज आणि उद्वव असलेलं हे छायाचित्र आम्हाला हवंय. ते साकार व्हायला हवं असं वाळूंज यांची संकल्पना आहे.
यानिमित्तानं मेळाव्यास्थळी उभारण्यात आलेल्या पोष्टरवरही कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत राज आणि उद्वव यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय.या मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याचअंतर्गत आगामी काळात एसएमसद्वारे तसंच नव्यान वेबसाईट सुरु करून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि गावपातळीपर्यत पोहचण्याचं ध्येय निश्चीत करण्यात आलंय.
No comments:
Post a Comment