Monday, September 13, 2010

भाजप नेते म्हणतात योगायोग...

अलाहाबाद उच्च न्यायालयानं अयोध्येतल्या वादग्रस्त जागेच्या निकालासंदर्भात २४ सप्टेंबर ही तारीख निश्चित केलीय. म्हणजे अयोध्यप्रश्नी पक्षनेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेचा विसावा वर्धापनदिन २३ तारखेला एक दिवस अगोदर आहे. असं असलंतरी भाजप या निकालाबाबत आशावादी आहे.अयोध्याप्रश्नी भाजपमध्ये सध्या शांतता आहे. हा निकाल न्यायालयात असल्यानं भाजप नेते कुणीही या वक्तव्यावर मत व्यक्त करण्यात तायर नाही. निकालाबाबत पक्षानं वेट अँन्ड वॉचची भूमिका स्विकारलीय.
हे खरं असलं तरी अडवानी यांनी आपल्या ताज्या ब्लॉगवरील लेखात अयोध्यानिकाल आणि आपल्या रथयात्रेला वीस वर्ष पूर्ण याविषयी विवेचन केलय. या दोन्ही घटना एक दिवसाआड पाठोपाठ येत आहे. अडवानींनी म्हणतात,माझे रोल मॉडेल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मतारीख 25 सप्टेंबर आहे. सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्राही 1990 मध्ये त्याच दिवशी काढली. त्याच दिवशी मी अजूनही नियमितपणं सोरटी सोमनाथाच्या दर्शनासाठी जातो. आता तर अयोध्या प्रकरणाचा निकाल 25 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारांय. हा सर्व योगायोग असल्याचे मी मानतो असं नमूद केलय. अयोध्या प्रकरणी पक्षनेते काहीही बोलण्यास तयार नाही,असं असलंतरी दर आठवड्याला भाजप मुख्यालयाशेजारी आंग्लभाषिक पत्रकारांचा दरबारच भरलेला दिसतो. त्यामुळं पक्षने त्यांची गोची झालीय. त्यांना पत्रकारांना काहीच माहिती देता येत नाही.
पक्षाध्यक्ष पद स्विकारल्यानंतर नितीन गडकरीनी अयोध्या प्रश्‍न घटनेच्या चौकटीत सुटावा, असं मत मांडलं होतं. भाजपमध्ये सध्या गडकरी गट विरूध्द राजनाथसिंह गट यांच्यात शीतयुद्धाचं वातावरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निकालानंतर गडकरी यांचे ते मत कायम राहील काय, काय पडसाद उमटतात याबाबतही उत्सुकता आहे. निकाल विरोधात गेल्यास काही वरिष्ठ नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दरवाजा ठोठावण्याचं निश्चित केलंय. अयोध्या प्रकरणाबाबत लिबरहान आयोगाचा अहवाल फेटाळणाऱ्या भाजपची केंद्रात सहा वर्षे सत्ता होती. त्यावेळेस हा अहवाल का आणला गेला नाही, अयोध्या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल त्या काळात का लागला नाही, या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे नाहीत.

No comments:

Post a Comment