Tuesday, February 3, 2009

कॉग्रेसनं आळवला यंग जनरेशनचा राग


कॉग्रेसनं आळवला यंग जनरेशनचा राग
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच काँग्रेसनं राष्ट्रीय स्तरावर एकला चलो.....चं धोरण जाहीर केलंय. असं करून समाजवादी पक्षाला धक्का देतांनाच, पक्षानं तरूणाईचा रागही आळवलायं. कॉग्रेसनं युवा नेते राहुल गांधींना तरूणांचे आयकॉन म्हणून पुढे करायला पक्षानं सुरूवात केलीय.
आगामी निवडणूकीमध्ये पस्तीशीच्या आत असलेले सुमारे आठ टक्यांवरचे तरूण मतदार पुढचं सरकार निवडणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॉग्रेसला तरूणांना आकर्षीत करत तीस टक्के जागा देण्याचं अश्वासन देणं भाग पडलयं. एकीकडं कॉग्रेस तरूणांना साद घालत आहे. तर दुसरीकडं अर्जुनसिंगासारखे ऐंशीतले जेष्ठ नेते खुर्ची अडवून आहे. त्यामुळं कॉग्रेसचीच नाही तर तरूणाईची गोची झाली आहे.
अर्जुनसिंगासह निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या जेष्ठांना समजवायचे कसे. त्यांची मनधरणी करायची कशी हाच कॉग्रेससमोरील मुख्य प्रश्न आहे. जेष्ठांना पक्षातील सन्मानाची पदे देण्याचं नियोजन कॉग्रेसनं केव्हाच सुरु केलंय. त्याप्रमाणं जेष्ठांवर जबाबदारीही सोपवली जात आहे. या विसंगत पार्श्वभूमीवर कॉग्रेसनं यंग जनरेशनचा राग आळवलाय. एकीकडे तरूण तुर्कांना साद घालतांना कॉग्रेसनं कोणत्याही घटकपक्षाबरोबर राष्ट्रीय पातळीवर समझोता न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय युपीएतल्या घटकपक्षांना दे धक्काच म्हणता येईल. समाजवादी पक्ष जागा वाटपाबाबत दबाव आणत आहे.
त्यापार्श्वभूमीवर कॉग्रेसनं एकला चलो...चं पाऊल उचलत घटक पक्षांसाठी सूचक इशारा दिला असल्याच मानलं जातंय. कॉग्रेस कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. हे कॉग्रेस दाखवू इच्छित असलीतरी, ज्या राज्यात कॉग्रेसची शक्ती क्षीण आहे. तिथं स्वबळावर लढण म्हणजे आत्मघात ठरेल. असा कयास राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय.

No comments:

Post a Comment