Friday, February 13, 2009

दलबदलूंची चलती...

लोकसभा निवडणूकीची तारीख अद्याप निश्चित नाही. पण एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यादृष्टीनं कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपा,शिवसेना,बसपा जनता दल अशा सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. पक्षाशी एकनिष्ठ असणा-या जेष्टांबरोबरच तरूणही पक्षाच्याच तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, नातेवाईकांच्या माध्यमातून तिकीट मिळवण्यासाठी संपर्क साधला जातोय. वशिला लावला जात आहे. काहींनी निवडणूकींचा चंग इतका बांधला आहे कि पक्षानं तिकीट न दिल्यास प्रसंगी इतर पक्षात जायचे, दुस-या पक्षानंही तिकीट नाकारलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचीच असा निश्चय मनाशी केला आहे. अशा दलबदलू कार्यकर्ते,इच्छुकांप्रमाणेच त्यांच्या पाठीराख्यांची तिच अवस्था झाली आहे.
पक्षाशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहणा-या कार्यकर्ते, नेत्यांची संख्या कमी नाहीत. प्रत्येक पक्षात असे डझनभर नेते,कार्यकर्ते आपल्याला पहायलाही मिळतील. पण पक्षातील एकनिष्ठता,प्रामाणिकपणाचं हे सुत्र गेल्या काही वर्षापासून बदलत चालले आहे. पक्षांपेक्षा स्वतःची पद,प्रतिष्ठा जपणा-या पुढा-यांची संख्याच वाढू लागली ही स्थिती थोड्याफार प्रमाणात सर्वच पक्षात आहे. पक्षांनी भरमसाठ पद निर्माण केल्यानं गल्लोगल्ली नेते,संघटक,पुढारी झालेले आपल्याला दिसतात. वरची पदे मिळायला लागल्यानंतर निवडणूक लढवण्याविषयीच्या त्यांच्या अपेक्षांही वाढणं स्वभाविकच आहे. हे जरी खरं असलं तरी पक्षातील या युवा अथवा बरेचवर्ष काम करणा-यांचा त्रास जेष्ठांना होऊ लागला आहे.
आगामी निवडणूकीतसर्वच पक्षांनी यंगजनरेशनचा अर्थांत तरूणांना संधी देण्याचा राग आळवला आहे. पण त्यांमुळं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील जेष्ठ नेत्यांची मोठी गोची झाली आहे. तरूणांना संधी दिल्यास आपले काय होणार याबद्दल चिंता आहे. दुसरीकडं सर्वच पक्षात तिकीट वाटपावरून गोंधळ होणार हे नक्की आहे. त्यामुळे युवकांचीच नव्हे तर पक्षातील जेष्ठांची नाराजी पत्कारावी लागेल. त्यातून स्वभाविकच पुढे बंडखोरी होणेही शक्य आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून इच्छुक असलेले उघडपणे बंडखोरीची भाषा करू लागले आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीनं ग्रासणार हे आता नक्की आहे. या अशा स्थितीमुळं सर्वाच मोठी अडचण ही संबंधीत नेत्यांला, पदाधिका-याला पाठींबा देणा-या पाठीराख्यांची होणार आहे. साहेब बाहेर पडतील आणि आपल्या बरोबर हजारो कार्यकर्ते आहे असं सांगत डांगोरा पिटतील. आणि मग त्यांचे पाठीराखेही स्वभाविकपणे म्हणतील.
केवळ साहेबांना(पदाधिकारी,नेत्याला) पक्षानं तिकीट नाकारलं म्हणून ते बाहेर पडले आणि त्यामुळं आम्हाला पक्षातून बाहेर पडणं गरजेचं होतं, अशा पाठीराख्यांची संबंधीत पक्षात काम करण्याची इच्छा असूनही केवळ साहेबांमुळं त्यांना बाहेर पडाव लागणार आहे....हे कार्यकर्ते,स्वयंसेवक स्वतः कधीच काही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच उठण्या-बसण्यापासून सर्व काही साहेबांवरच अवलंबून असते. सारखे एका पक्षातून दुस-या तिस-या पक्षात जाणा-यां, स्वयंघोषित दलबदलू पुढा-यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवणं पक्षाला शक्य नाही.
पण लोकांनी अशा दलबदलू नेत्यांला त्यांच्या कार्यकर्त्यांना किती जवळ करायचे, त्याला किती साथ द्यायची हे लोकसभेपुर्वीच निश्चीत करायला हवे. आपल्या भागासाठी अशा व्यक्ती, कार्यकर्त्यांचा काही उपयोग नसेल तर त्यांना निवडून देण्यापेक्षा दूर ठेवणेच योग्य वाटते...अखेर हा ज्यांचा-त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे हे नक्की...

No comments:

Post a Comment