Tuesday, February 17, 2009

राष्ट्रकुलसाठी भरीव तरतूद

स्पर्धपैकी एक असलेली मानाची स्पर्धा म्हणून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ओळखली जाते. ही स्पर्धा पुढील वर्षी दिल्लीत होत आहे. या स्पर्धेसाठी केंद्र सरकार अर्थसंकल्पात किती आर्थीक तरतूद करते. याबद्दल क्रीडाक्षेत्रात उत्सुकता होती. काल सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकारनं ९६४.४२ कोटींची तरतूद केली आहे. या तरतूदीत स्टेडियम्सचे नूतनीकरण,खेळाडूंचे प्रशिक्षण, क्रीडांगणांची डागडुजी अशा काही कामांचा समावेश आहे. एक मात्र नक्की की या तरतूदीमुळं दिल्लीत क्रीडाक्षेत्र वाढीसाठी पुरक ठरतील अशा कायमस्वरूपाच्या सुविधा उभ्या राहण्यास मदत होणार आहे.
विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचं काम जवळपास एक वर्षापासून विविध पातळीवर सुरु झाले आहे.संयोजक दिल्लीकर सध्या याच कामात जास्त व्यस्त असल्याचं दिसून येते. दिल्लीवर जबाबदारी असल्यानं खेळापासून तर आदरातिथ्यापर्यत सर्वच पातळीवर आपण कमी पडणार नाही. याची काळजी ते घेतांना दिसत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वच पक्षांनी एकजूट दाखवलेली दिसते.
आपली स्पर्धा असल्यांन त्यात कुठलीच कसर राहता कामा नये हाच प्रत्येकाचा हेतू आहे. त्यामुळंच स्पर्धानिधीला तरतूदीला कुणाचाही विरोध दिसला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या९६४.४२ कोंटीच्या भरीव तरतूदीशिवाय क्रीडा व युवक कल्याणसाठीचा निधीही वाढवण्यात आला आहे. हा निधी गेल्या वर्षी१५९३ कोटी रूपये होता. ती रक्कम आता १७६४ रूपयांच्या घरात गेली आहे. ही देखील चांगली बाब आहे. राष्ट्रकुलच्या रक्कमेतील६०० कोटी रूपये भारतीय क्रीडा प्राधिकरणाला स्टेडियमच्या नुतनीकरणासाठी तर शंभर कोटी रूपये संघाच्या तयारीसाठी देण्यात आले आहे. यात स्टेडियमचे अत्याधुनिकरण करण्याबरोबरच संघास प्रोत्साहन दिले आहे असं म्हणता येईल.
स्टेडियम तर अत्याधुनिक होईल पण आतील क्रीडांगणही मैदानही तितकेच सुसज्ज असायला हवे यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे सर्व राजकीय सपोर्ट मिळाल्याशिवाय करणं शक्य नाही. अर्थात दिल्लीकरांचा त्यासाठी खरोखरच खूप सपोर्ट मिळत आहे. दिल्लीकर आता आठ ते नऊ महिन्याचा कालावधी राहिला आहे... कीप इट अप...

No comments:

Post a Comment