Friday, February 13, 2009

सरांचा दे धक्का....


शिवसेना कार्यकर्ता,नगरसेवक...आमदार...खासदार आणि देशातील मानाचे लोकसभेचे सभापतीपद भूषवण्याची संधी मिळालेले शिवसेना जेष्ठ नेते मनोहर जोशी. शिवसेनेंतच नव्हे तर सर्वांनाच सर म्हणून परिचित असलेल्या सरांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचं जाहीर करत सर्वांनाच दे धक्का दिला आहे.
वक्तृत्वशैली, संघटनकौशल्य, नियोजनबध्द काम आणि शिस्त,संयम आणि शांततेला प्राधान्य देणारे नेते म्हणून ते परिचित आहे. त्यामुळंच बाळासाहेबांच्या निवडक जवळच्या सहका-यांमध्ये जोशीसरांचा नंबर तसा वरचाच. शिवसेनेत बाळासाहेबाचा शब्द हा अंतिम असतो. जोशी सर देखील या अंतिम शब्दाचे प्रामाणिकपणे पालन करतांना नेहमीच दिसतात. अंतर्गत राजकारण,डावपेच तर त्यांना मूळीच पसंत नाही.
कार्यकर्ता हा तळागाळात काम करणारा आणि दिलेल्या कामाशी प्रामाणिकच हवा असं त्यांना मनोमन वाटते. पक्षात त्याचदृष्टीनं तसाच कार्यकर्ता घडवण्यावर त्यांचा भर दिसतो. असे हे सर सध्या त्यांच्या निवडणूकीच्या मुद्यांन चांगलेच चर्चेत आले आहे. सरांना तिकीट मिळणार यात शंकाच नाही. त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांपासून तर अगदी नातलगापर्यत सर्वांनीच तयारी सुरु केलेली होती.
जोशी सर कुठून निवडणूक लढवता हा प्रश्न किरकोळ होता. पण दोन दिवसांपुर्वी सरांनी अचानक आपण निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. आणि सर्वानांच आश्चर्यांचा धक्का दिला. सर निवडणूक लढवणार आणि आतापर्यतचे सर्व रेकॉर्ड मोडून प्रचंड मतांनी विजयी होणार यात शंका नाही. त्यादृष्टीनंच सर्व नियोजन झालेलं होते. मात्र सरांच्या या निर्णयानं मिडीयावले अचंबित झाले. सर असा निर्णय घेतील अस कुणालाही वाटलं नव्हते
.....युतीतील त्यातही दिल्लीतील राजकारणाची योग्य माहीती असणारे ते एक जबाबदार नेते म्हणून परिचित आहे. त्यामुळं सरांवर सभांतील प्रमुख वक्ते आणि सभा नियोजनांची जबाबदारी त्यांचेवर टाकण्याची शक्यता वर्तवली जातेय विशेषतः मुंबईच्या सभांचा प्रमुख भार त्यांचेवर असेल...आघाडी सरकारच्या अपयशाचा पाढा जनतेसमोर मांडणं. तसंच केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याचं ध्येय असेल. याशिवाय राज्यात युतीचा भगवा फडकावण्याचं आवाहनंही त्यांचेसमोर असेल. त्यादृष्टीनं त्यांना सुत्रबध्द नियोजन करावं लागेल.

No comments:

Post a Comment