Friday, February 6, 2009

देव तारी त्याला....


ठिकाण चर्चगेट रेल्वेस्टेशन....वेळ सकाळी साडेनऊ-दहाची...जिवाची मुंबई अर्थांत मुंबई फिरण्यासाठी औरंगाबादकडील एक जोडपं आपल्या दोन जुळया मुलींसह स्थानकावर उभे होते...कधीही लोकलचा प्रवास न केलेल्या या सुशिक्षित जोडप्यास आपल्या बोरीवली इथल्या नातेवाईकांकडं जायचे असल्यानं ते लोकलची वाट पहात होते... सकाळची वेळ असल्यानं रोजचीच तोबा गर्दी. गर्दी कशाला म्हणता याचा आणि गर्दीतील प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर वेस्टर्न साईटला जरूर जावे असे म्हणतात. अगदी तशीच परिस्थिती येते. हे जोडपं नवीन असल्यानं या भागाची फारशी काहीच माहीती नाही. त्यामुळं इकडं तिकडं चौकशी करून त्यांनी कसातरी प्लँटफॉर्म गाठला खरा पण तोही चूकीचा...त्यांना प्लँप्टफॉर्म संदर्भात चूकीची माहीती देण्यात आली होती. बोरीवलीकडं जाणारी नऊ अडोतीसची लोकल येण्याची उदघोषणा झाली...आपण चूकीच्या प्लॅटफार्मवर उभे आहोत. हे लक्षात आल्यानंतर जोडप्यांची एकच धांदल उडाली. तोबा गर्दीतून वाट काढत जुळ्या मुलींसह ते उभी असलेली गाडी पकडण्यासा जोडपे धावले. प्लॅटफाँर्मवर पोहचले जरूर...लोकलची सवयच नसलेल्या त्या महिलेनं एवढ्या गर्दीतून गाडीही पकडली...एक मुलगी तिच्याबरोबच चढली पण दुसरी मात्र खालीच राहिली....फास्ट लोकल असल्यानं लोकल वेग घेऊ लागली...तोबा गर्दीमुळं पतीला चढण्याची संधीच मिळाली नाही. ती महिला डब्यात चढलेली असल्यांन तिची मोठी पंचाईत झाली....एका मुलींला लोकलमध्ये आत सोडून दुस-या मुलींला घेण्यासाठी खाली उतरणं तिला शक्य नव्हतं...आई गाडीत बसल्यानं प्लॅटफार्मवर उभी असलेली ती मुलगी रडत रडत धावतच सुटली...गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या महिलेनं बाहेर उडी घेण्याचा प्रयत्न केला....गर्दीतून बाहेर अंग झोकून देण्याचा प्रयत्न केला.....तिचं शरीर आत आणि पाय प्लॅप्टफॉर्मवर अशी परिस्थिती होतीर...एवढ्या गर्दीतून मुलींबरोबर धावणा-या तिच्या पतीनं हे दृश्य पाहिलं...त्यांन तिचं बाहेर असलेले हात पाय दोन्हीही आत जोरात ढकलून दिले आणि प्लॅटफॉर्म संपण्याच्या आत स्वतःलाही सावरलं..... चर्चगेट स्टेशनवरही पती आणि त्या दुस-या मुलींची गोंधळलेली स्थिती झाली होती. तिकीट,पर्स आणि मोबाईल, पैसे सर्वजण त्या माणसाकडंच असल्यानं त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. काहीच माहीती नसल्यानं चूकून पुरुषांच्या डब्यात शिरलेली ती महिला आणि तिची मुलगी दोघेही रडायला लागल्या..लोक त्या दोघींची समजूत काढत होते...कुठे जायचे...कुठून आल्यात यासारखी चौकशी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते....एकापाठोपाठ एक स्टेशन जात होते पण त्या मायलेकीचं रडण काहीच थांबत नव्हते...बोरीवलीला जायचंय एवढेच सांगत त्या दोघीही रडतच होत्या...अखेर त्या गर्दीतील एका माणसानं पतीकडं मोबाईल आहे का..असल्यास नंबर सांगा असं म्हणत त्या महिलेची समजूत काढली...गोंधळलेल्या स्थितीत असलेल्या त्या महिलेनं स्वतःला सावरत पतीचा मोबाईल नंबर त्याला व्यक्तीला सांगितला...त्या व्यक्तीनं तातडीनं तो मोबाईल लावत त्या महिलेचं आणि तिच्या पतीचं संभाषण करून दिलं...एकमेकांत बोलण झाल्यानं त्या दोघांनाही आधार वाटला...बोरिवली स्टेशनवर उतरून पोलिसांजवळ थांबण्याच ठरलं...पती आणि तिची दुसरी मुलगी हे दुस-या लोकलनं बोरीवलीला उतरले...तो माणूनस आपल्या पती आणि मुलींचा शोध घेऊ लागला...त्याला दोघीही एका पोलिसांजवळ उभ्या असलेल्या दिसल्या....त्या महिलेनं तातडीनं पतीला मिठी मारली...दुस-या मुलींला जवळ घेत कुरवाळले...आणि आपल्या बोरीवलीच्या नातेवाईकांना फोन करून त्यांनी बोलावून घेत मग त्यानंतर त्याच्याबरोबर घरी गेले.. मोबाईलद्वारे संपर्क करून देणारी ती व्यक्ती देवाच्याच रूपात आली असावी शिवाय देवामुळंच आपण वाचलो असं महिलेला वाटू लागलं. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी...याची अनुभूती या जोडप्याला रेल्वे प्रवासात आली. असे प्रसंग नेहमीच घडतात पण त्यावेळी संबंधीत व्यक्ती परिस्थितीनुसार किती दक्ष आणि आणि सामजस्य भूमिका घेते यावर बरेच काही अवलंबून असते....

5 comments:

  1. I invite you to visit my blog. you can find my last works of art at:

    www.claudiotomassini.blogspot.com

    yours Claudio Tomassini

    ReplyDelete
  2. khar tar blogspot suru karnyachya nirnayabaddal tumach khup khup abhinandan

    badallelya fast lifestyle madhye hi ya blog dware vachakanchi sanvedanshilta jagrut theval ashi apeksha
    punha ekda ya blog cha manapasun swagat

    ReplyDelete
  3. ShrikrishnaJi, kharach khup chhan paddhatine tumhi ha prasang sangitala aahe.
    Mumbai madhe rahane aani surakshit jeevan jagane hi goshtach chamatkarasarkhi mhanavi lagel. Tithlya garditun vaat kadhat local pakadane ani pakadlyavar aat ubhe rahane hi farach tarevarachi kasarat asate ha anubhav mi suddha kahi vela ghetala aahe.
    Ek manus local madhye chadhat asatanna khali nisatun padla ani tyache ardhe sharir platform var tar ardhe rulavar ase ghasarat jaun tyacha mrutyu jhalyacha mi swatahachya dolyanni pahila aahe. Ajunahi ha prasang aathavla ki mala khup tras hoto.
    Bomb-blast, gundgiri, prachand gardi,apariharya asa localcha pravas he sagale sahan karat jaganarya Mumbaikarancha jeevan keval devachyach haatat aahe ase mhanave laagel...

    ReplyDelete
  4. श्रीकृष्ण तू ब्लॉग लिहायला सुरवात केल्याबद्दल खरं तर तुझं पहिल्यांदा अभिनंदन. आपली मते आणि विचार व्यक्त करण्यासाठी ब्लॉग ही खूप चांगली सोय आणि सुविधा आहे. बाकी तुझे लेखन खूपच चांगले आहे. वेगवेगळे विषयही हाताळतो आहेस. यापुढेही असेच लिहित जा...

    ReplyDelete
  5. Wa khup chan lihilay ha prasng tumhi. Mumbai baherun aalelya kityekjananchi ashi avastha hot asel nahi? asha veli ya mobile cha upayog pan kasa hote he pan dakhavalet tumhi. sadhya mobile hi fakt chainichi gosht nasun garajechi aahe he yatun kalun yete aani local madhil gruhasthane dakhavalele soujanya khupach manala bhavate...nahitar ase soujanya qvachitach pahayala milate...yogayoganech tumacha ha blog mazya vachanat aala.... khup chan.... keep it up......

    ReplyDelete